Advertisement

मुंबई-ठाण्यात ३ लाख २२ हजार २६९ शिवभोजन थाळ्यांचं वाटप

दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत ५ रुपये थाळी याप्रमाणे गरजूंना शिवभोजन केंद्रावर शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येते.

मुंबई-ठाण्यात ३ लाख २२ हजार २६९ शिवभोजन थाळ्यांचं वाटप
SHARES

मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यामध्ये १ मे ते २७ मे पर्यंत ५६ शिवभोजन केंद्रातून ५ रूपये प्रति थाळी याप्रमाणे ३ लाख २२ हजार २६९ शिवभोजन थाळ्यांचं (Shiv bhojan thali) वाटप करण्यात आल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, कैलास पगारे यांनी दिली यांनी दिली.

तर राज्यात १ मे ते २७ मे पर्यंत ८३३ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे २९ लाख ४६ हजार ९११ शिवभोजन थाळ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. 

कुणीही उपाशी राहू नये

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेचा तालुकास्तरावर (taluka level) विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा- राज्यात मे महिन्यात २८ लाख ३७ हजार शिवभोजन थाळ्यांचं वाटप

सरकारी अनुदान

 शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये इतकं अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येत आहे. यासाठी शासनाने यापूर्वीच निधीची तरतूद केली आहे. लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने लॉकडाऊनच्या (lockdown) सुरू असेपर्यंत शिवभोजन थाळी योजनेचा लाभ  सुरु राहणार आहे. दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत ५ रुपये थाळी याप्रमाणे गरजूंना शिवभोजन केंद्रावर शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येते. 

गरजूंना दिलासा

या निर्णयानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाही त्यांना शिव भोजनाचा लाभ घेण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात येत आहे. तसंच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.  या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा