
शहरातील संसर्गजन्य आजारांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत डेंग्यूच्या संशयित रुग्णांबाबत चर्चा करण्यात आली तसेच आजाराचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
संशयित रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्याच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक मजबूत करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.
डेंग्यूचा प्रसार प्रामुख्याने संक्रमित एडीस डासांच्या चाव्यामुळे होतो. हे डास साचलेल्या पाण्यात वाढतात. पावसाळ्यात घरांच्या परिसरात, इमारतींमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता असते.
त्यामुळे आरोग्य विभागाकडून डास नियंत्रणाच्या उपाययोजनांवर भर देण्यात येत असून नागरिकांमध्येही जनजागृती केली जात आहे.
घराच्या परिसरात किंवा घरातील कोणत्याही वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कुलर, कुंड्या, टाक्या, टायर किंवा इतर ठिकाणी साचलेले पाणी नियमितपणे काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उल्हासनगरमध्ये सध्या डेंग्यूचे 30 संशयित रुग्ण आरोग्य विभागाच्या निरीक्षणाखाली आहेत. संभाव्य उद्रेक रोखण्यासाठी शहरातील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
