वानखेडे स्टेडियमवर होणार्या भारत-श्रीलंका T20 सामन्यापूर्वी दक्षिण मुंबईत आज वाहतूक निर्बंध लावण्यात आले आहेत. हे निर्बंध दुपारी 3 वाजता लागू होतील आणि रात्री 11.45 पर्यंत लागू राहतील, अशी माहिती मुंबई ट्राफिक पोलिसांनी ट्विटरवर दिली आहे.
दि. ३ जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात येणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट सामन्यास गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक नियोजनामध्ये पुढील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत: pic.twitter.com/TUsbjQfFEF
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) January 3, 2023
वाहतूक पोलिसांनी सांगितले की, डी रोडवरील जंक्शनपासून ते सी रोडवरील जंक्शनपर्यंत सर्व वाहनांसाठी ई रोड वन-वे (दक्षिण-दिशा) असेल.
हेही वाचा