वांद्र्यातील कलानगर आणि खेरवाडी परिसरातील नागरिकांना यंदा पावसाळ्यात पाणी तुंबणाच्या त्रासाला सामोरे जावं लागणार आहे. या भागातील रस्त्यालगत असलेल्या नाल्याच्या रुंदीकरणाचं काम वेळीच पूर्ण होऊ न शकल्याने या भागातील रहिवाशांना यावर्षीही या त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याचं बोललं जात आहे.
यंदाही पाणी तुंबणार?
मुंबईतील वांद्रे कलानगर आणि खेरवाडी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबतं. मागील वर्षी २८ ऑगस्ट रोजी पडलेल्या मुसळधार पावसातही या भागातील पश्चिम द्रुतगती महामार्ग परिसरात पाणी तुंबलं होतं. त्यामुळे या भागात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी सातत्याने होत असतानाही यावर तोडगा मिळत नव्हता. परंतु, मागच्या वर्षी केलेल्या सर्वेमध्ये येथील अरुंद नाल्यामुळेच हे भरतीच्यावेळी पाऊस आल्यास पाणी तुंबतं. त्यानंतर या पाण्याचा वेळीच निचरा होत नसल्याने या भागात पाऊस थांबल्यानंतरही पाणी तुंबलेलं असते.
प्रस्ताव कागदी घड्यांमध्येच
या अरुंद नाल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या कलानगर जंक्शन ते नंदादीप कल्व्हर्ट पर्यंतच्या रस्त्यालगतच्या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, पावसाळा आला तरी नाल्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. पावसाळा सुरु झाल्यानंतर या नाल्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजुरीला स्थायी समितीपुढे आणला आहे. विशेष म्हणजे या नाल्याचं काम पावसाळ्यापूर्वी हाती घेतलं जावं यासाठी एमएमआरडीएने महापालिकेला एनओसीही दिली होती. परंतु, नाल्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव कागदी घड्यांमध्येच अडकून पडला होता.
याचं काम हाती घेतलं
ओएनजीएसी ते खेरवाडीपर्यंत पश्चिम द्रुतगती महामार्गाशेजारी हा नाला जात आहे. हा नाला ओएनजीसीजवळ ८ मीटर रुंदीचा आहे. परंतु, पुढे खेरवाडीपर्यंत हा नाला अडीच ते चार मीटर एवढाच रुंद आहे. त्यामुळे या नाल्यातील बॉटलनेक काढण्यासाठीचा प्रस्ताव बनवण्यात आला असून त्यानुसार त्यांचं काम हाती घेण्यात येत असल्याची माहिती एच/पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांनी यांनी दिली.
यंदाही पाण्याची समस्या कायम?
या नाल्याचं काम युद्धपातळीवर होणं आवश्यक होतं. पण याला विलंब झाल्यानं यंदाही पाण्याची समस्या कायम राहिल. परंतु, याठिकाणी लोकांना कशाप्रकारे कमीत कमी त्रास होईल यासाठी महापालिका प्रयत्नशील राहणार आहे. याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी या भागातील रहिवाशांना अधिक दिलासा मिळेल, असाही विश्वास ससाणे यांनी व्यक्त केला.
वांद्र्यातील कलानगर आणि खेरवाडी परिसरातील नागरिकांना यंदा पावसाळ्यात पाणी तुंबणाच्या त्रासाला सामोरे जावं लागणार आहे. या भागातील रस्त्यालगत असलेल्या नाल्याच्या रुंदीकरणाचं काम वेळीच पूर्ण होऊ न शकल्याने या भागातील रहिवाशांना यावर्षीही या त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याचं बोललं जात आहे.
यंदाही पाणी तुंबणार?
मुंबईतील वांद्रे कलानगर आणि खेरवाडी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबतं. मागील वर्षी २८ ऑगस्ट रोजी पडलेल्या मुसळधार पावसातही या भागातील पश्चिम द्रुतगती महामार्ग परिसरात पाणी तुंबलं होतं. त्यामुळे या भागात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी सातत्याने होत असतानाही यावर तोडगा मिळत नव्हता. परंतु, मागच्या वर्षी केलेल्या सर्वेमध्ये येथील अरुंद नाल्यामुळेच हे भरतीच्यावेळी पाऊस आल्यास पाणी तुंबतं. त्यानंतर या पाण्याचा वेळीच निचरा होत नसल्याने या भागात पाऊस थांबल्यानंतरही पाणी तुंबलेलं असते.
प्रस्ताव कागदी घड्यांमध्येच
या अरुंद नाल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या कलानगर जंक्शन ते नंदादीप कल्व्हर्ट पर्यंतच्या रस्त्यालगतच्या पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, पावसाळा आला तरी नाल्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले नाही. पावसाळा सुरु झाल्यानंतर या नाल्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजुरीला स्थायी समितीपुढे आणला आहे. विशेष म्हणजे या नाल्याचं काम पावसाळ्यापूर्वी हाती घेतलं जावं यासाठी एमएमआरडीएने महापालिकेला एनओसीही दिली होती. परंतु, नाल्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव कागदी घड्यांमध्येच अडकून पडला होता.
याचं काम हाती घेतलं
ओएनजीएसी ते खेरवाडीपर्यंत पश्चिम द्रुतगती महामार्गाशेजारी हा नाला जात आहे. हा नाला ओएनजीसीजवळ ८ मीटर रुंदीचा आहे. परंतु, पुढे खेरवाडीपर्यंत हा नाला अडीच ते चार मीटर एवढाच रुंद आहे. त्यामुळे या नाल्यातील बॉटलनेक काढण्यासाठीचा प्रस्ताव बनवण्यात आला असून त्यानुसार त्यांचं काम हाती घेण्यात येत असल्याची माहिती एच/पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांनी यांनी दिली.
यंदाही पाण्याची समस्या कायम?
या नाल्याचं काम युद्धपातळीवर होणं आवश्यक होतं. पण याला विलंब झाल्यानं यंदाही पाण्याची समस्या कायम राहिल. परंतु, याठिकाणी लोकांना कशाप्रकारे कमीत कमी त्रास होईल यासाठी महापालिका प्रयत्नशील राहणार आहे. याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी या भागातील रहिवाशांना अधिक दिलासा मिळेल, असाही विश्वास ससाणे यांनी व्यक्त केला.