मुंबई - आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे भाज्यांच्या दरात घट झाली आहे. यापूर्वी ग्राहकांना प्रती किलोमागे 100 ते 120 रुपये मोजावे लागत होते. मात्र पावसामुळे भाज्या 30 ते 50 रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जात आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही खुशखबरच म्हणावी लागेल.
मुंबईतील भाज्यांचे प्रतिकिलो दर ( किरकोळ बाजारात )
भेंडी - 30 ते 50 रु.
कोबी - 15 ते 25रु.
टोमॅटो - 15 ते 20रु.
वाटाणा - 70 रु.
फरसबी - 30 रु.
काकडी - 15 ते 20रु.
मिरची - 15 ते 20रु.
गाजर - 20 ते 30 रु .