दिल्लीतील वायू प्रदूषणात भयंकर वाढ झाल्याने दिल्लीकरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे बहुतांश दिल्लीकर आपल्या कुटुंब कबिल्यासहित अल्पावधीसाठी दिल्लीबाहेरचा रस्ता धरत अाहेत. यांत भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू आशिष नेहरा याचाही समावेश आहे. आशिषने आपल्या कुटुंबाचा वायू प्रदूषणापासून बचाव होण्यासाठी मुंबईचा आसरा घेतला आहे.
आशिष नेहराला मुलगा अरश आणि मुलगी एरियाना यांच्या प्रकृतीची काळजी वाटत असल्याने दोन मुले आणि पत्नी रेश्मासोबत आठवड्याभरापूर्वीच आशिष मुंबईत वास्तव्यासाठी आला.
नेहरा म्हणतो 'माझ्या कुटुंबाला दिल्लीतील प्रदूषणामुळे कोणताही अपाय होऊ नये, यासाठी मी मुंबईत राहायला आलो आहे. यापूर्वी आम्ही गोव्यात राहण्याचा निर्णय घेतला होता. माझी ६५ वर्षांची आई आणि ७० वर्षांचे वडील अजूनही दिल्लीतच रहात आहेत. त्यांची मला काळजी वाटत आहे, अशी खंतही आशिषने यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा -
म्हणून, नेहरा घेतोय क्रिकेटमधून निवृत्ती?