Advertisement

आंध्रप्रदेश विरूद्ध मुंबई रणजी सामना अनिर्णीत


आंध्रप्रदेश विरूद्ध मुंबई रणजी सामना अनिर्णीत
SHARES

श्रीकर भरतची शानदार कामगिरी आणि रिकी भुईची अर्धशतकी खेळी या जोरावर आंध्र प्रदेश संघाने रणजी ट्रॉफीच्या ग्रुप 'सी'मधील सामन्यात मुंबईसोबत बरोबरी साधली. मुंबईने दुसऱ्या डावात ६ बाद २७९ धावा करत आंध्र प्रदेशला ८१ षटकांत ३९७ धावा बनवण्याचं आव्हान दिलं.


आंध्र प्रदेशचे ६ सामन्यांत १९ गुण

आंध्र प्रदेशने दिवसाचा खेळ संपण्याच्या ५ मिनिटे अगोदर ५ बाद २१९ धावा करत एक गुण मिळवला. मुंबईला पहिल्या डावातील आघाडीमुळे ३ गुण मिळाले होते. त्यामुळे ५ सामन्यांमध्ये मुंबईचे एकूण १४ गुण झाले आहेत. तर आंध्र प्रदेशचे ६ सामन्यांत १९ गुण झाले आहेत. 

भरत याने ६८ आणि डिबी प्रशांतने ४० धावा करत आंध्र प्रदेश संघाला मजबूत स्थितीत आणलं. भरत आणि डिबी या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागिदारी केली. भरतने आपली जबाबदारी सांभाळत १६२ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकार लगावले. भुईने देखील ८४ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. मुंबईकडून कर्श कोठारीने ३, तर शार्दूल ठाकूरने २ बळी घेतले.

मुंबईने पहिल्या डावात ३३२ धावा, तर दुसऱ्या डावात ४ बाद १९० धावा केल्या. त्यात कर्णधार अादित्य तरे याने ५ आणि श्रेयस अय्यरने ८९ धावा केल्या. हे दोघेही बाद झाल्यानंतर अभिषेक नायरने नाबाद ३८ आणि धवल कुलकर्णी याने ३३ धावा करत संघाच्या धावसंख्येत भर घातली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा