Advertisement

भारत- ऑस्ट्रेलियामध्ये ३ डिसेंबरपासून पहिली कसोटी

गेले दोन-अडीच महिने ठप्प झालेलं क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे.

भारत- ऑस्ट्रेलियामध्ये ३ डिसेंबरपासून पहिली कसोटी
SHARES

जगात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाऊन देखील वाढत आहे. त्यामुळे क्रिकेटही ठप्प झाली आहे. यंदाची आयपीएल स्पर्धाही रद्द झाली आहे. पण आता गेले दोन-अडीच महिने ठप्प झालेलं क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे.

आता आयसीसीने ने भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबर महिन्यात नियोजित करण्यात आला असून ३ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा दौरा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोरचं आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकतं. याच कारणासाठी बीसीसीआय ने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका खेळण्यास होकार दर्शवला आहे.

बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका 

पहिली कसोटी – ३ ते ८ डिसेंबर ब्रिसबेन मैदानावर, दुसरी कसोटी (दिवस-रात्र) – ११ ते १५ डिसेंबर अडलेड ओव्हल मैदानावर, तिसरी कसोटी (बॉक्सिंग डे) – २६ ते ३० डिसेंबर मेलबर्न मैदानावर तर चौथी कसोटी – ३ ते ७ जानेवारी २०२१ सिडनीला होणार आहे.

याआधी २०१८-१९ मध्ये खेळवण्यात आलेली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका भारताने २-१ ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे भारताने कसोटी मालिका २-१ ने जिंकली.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा