कावेरी मुद्द्यावरून तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यात सुरू असलेला वाद आता आयपीएलपर्यंत पोहोचला असून आयपीएलच्या कोणत्याही मॅचेस तामिळनाडूमध्ये होणार नसल्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. या वादातून आयपीएलच्या मॅचेसला मोठ्या प्रमाणावर विरोध केला गेला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा कोणताही सामना आता तामिळनाडूमध्ये होणार नाही.