आठवड्याभरात संचारबंदीचे उल्लघंन करणाऱ्या 289 जणांना अटक

25 जणांना नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे. तर 22 आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.

आठवड्याभरात संचारबंदीचे उल्लघंन करणाऱ्या 289 जणांना अटक
SHARES


देशासह महाराष्ट्रात सध्यो कोरोना या संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. पाहता पाहता महाराष्ट्रात कोरोनाचे 126 रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमिवर मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचार बंदी लागू करत अत्यावश सेवा देणारा दुकाने वगळता शाळा, हाँटॆल, बार, पान बिडी शाँप आणि इतरंना व्यवसाय करण्यावर बंदी घातलेली आहे. माञ तरी ही कायदा पायदळी तुडवत व्यवसाय करणाऱ्या  289 जणांवर पोलिसांनी आतापर्यंत गुन्हे दाखल करत अटक केली आहे. त्यापैकी 25 जणांना नोटीस देऊन सोडण्यात  आलं आहे. तर 22 आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.



कोरोना हा संसर्ग रोग असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी त्याचा प्राधुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सीमा बंद करून संचार बंदीचे आदेश दिले. तसेच शाळा महाविद्यालय, खासगी कंपन्या बंद किंवा 'वर्क फाँर्म होम'चे आदेश दिले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देऊन सुद्धा काही ठिकाणी दुकानॆ उघडी अथवा छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी असे नियम पायदळी तुडवणाऱ्या दुकानदारांविरोधात धडक कारवाई सुरू केली.

मुंबई आणि उपनगरांसह पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 289 जणांवर गुन्हा नोंदवला आहे. त्यात होम क्वारंनटाइनकरून बिनदिक्कत फिरणारे, हाँटेल, पान टपरी, दुकाने, फेरीवाले,  सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करणारे, अवैध वाहतूक यांचा समावेश आहे.  20 मार्च व 21 मार्च रोजी 34 जणांवर कारवाई केली,  22 आणि 23 मार्च रोजी 59 जणांवर कारवाई करत त्यांना अटक केली. तर 24, 25,26 मार्च रोजी पोलिसांनी सर्वाधिक म्हणजे 196 जणांना नियमांचे उल्लघंन केल्या प्रकरणी अटक करत गुन्हा नोंदवलेला आहे. या सर्वांवर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कायदा 1860 कलम 188 नुसार कारवाई करण्यात आला आहे.
 
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा