मुलुंड - मुलुंडच्या आर्य समाज केंद्राजवळ 6 दुचाकी आणि 1 चारचाकी अज्ञातांनी जाळली. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. यात सर्व गाड्या जळून खाक झाल्या आहेत. पहाटे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर, या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली आहे.