अॅक्सिस बँकेला बनावट कागदपत्र सादर करून २९० कोटींचा चुना लावणाऱ्या तीन कंपन्यांच्या मालकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. भवरलाल भंडारी (४६), प्रेमल गोरागांधी (४०), कमलेश कानुनगो (४१) अशी या आरोपींची नावं आहेत. क्रेडिट सुविधेच्या मदतीने बँकेकडून घेतलेले कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप या तिघांवर आहे. या प्रकरणातील अन्य पाच आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.
संपूर्ण प्रकार?
अॅक्सिस बँकेने २०१० मध्ये अल्पमुदतीवर पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीला १२५ कोटींचे कर्ज दिलं होतं. कर्ज वेळेत फेडून आरोपींनी बँकेचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर २०११ ते २०१३ मध्ये या आरोपींनी अल्प मुदत आणि क्रेडिट सुविधदेचा वापर करत २९० कोटींचं कर्ज घेतलं होतं. इतर बँकांकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी ही रक्कम घेतली खरी, मात्र या आरोपींनी कर्ज फेडलाच नाही.
या आरोपींनी केवळ कागदोपत्री व्यवहार बँकेला दाखवून बँकेची फसवणूक केली. या फसवणुकीत बँकेत दिलेल्या कागदपत्रांमध्ये इतर कंपन्यांच्या नावांचा वापर केल्याची माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे.
बँकेची फसवणूक
या गैरव्यवहारात ट्रायसोन मेटालेक्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक भवरलाल भंडारीला ७० कोटी रुपये मिळाल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्याच्या स्वाक्षरीही काही कागदपत्रांवर दिसून आल्या आहेत. त्याचप्रमाणे गैर व्यवहारातील ५० कोटींची रक्कम सूर्य किरण फेरा अलॅय प्रा. लि. या कंपनीचे संचालक गोरागांधी यांच्यामार्फत मिळवल्याचा आरोप आहे. त्यामध्ये काही नावे पुढे येत आहे.
तुर्तास पोलिसांनी या घोटाळ्यात सहभागी असलेल्या तिघांना अटक केली असून त्यापैकी भवरलाल हा वरळीत राहतो. तर गोरागांधी ग्रँटरोडचा रहिवासी आहे. तर तिसरा आरोपी कमलेश हा प्रभादेवी परिसरात रहात असल्यची माहिती पोलिसांनी दिली आहे.
१२ मे २०१७ रोजी हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या गैरव्यवहारात पारेख एल्युमिनेक्स लिमिटेडचे संचालक अमिताभ पारीख, राजेंद्र गोठी, देवांशू देसाई, किरण पारेख आणि विक्रम मोर्दानी यांची नावंही पुढे आली असून यातल अमिताभ याचा २०१३ मध्ये मृत्यू झाला, तर उर्वरित आरोपींवर अटकेची टांगती तलवार लोंबकळत आहे.
अॅक्सिस बँकेला बनावट कागदपत्र सादर करून २९० कोटींचा चुना लावणाऱ्या तीन कंपन्यांच्या मालकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. भवरलाल भंडारी (४६), प्रेमल गोरागांधी (४०), कमलेश कानुनगो (४१) अशी या आरोपींची नावं आहेत. क्रेडिट सुविधेच्या मदतीने बँकेकडून घेतलेले कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप या तिघांवर आहे. या प्रकरणातील अन्य पाच आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.
संपूर्ण प्रकार?
अॅक्सिस बँकेने २०१० मध्ये अल्पमुदतीवर पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीला १२५ कोटींचे कर्ज दिलं होतं. कर्ज वेळेत फेडून आरोपींनी बँकेचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर २०११ ते २०१३ मध्ये या आरोपींनी अल्प मुदत आणि क्रेडिट सुविधदेचा वापर करत २९० कोटींचं कर्ज घेतलं होतं. इतर बँकांकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी ही रक्कम घेतली खरी, मात्र या आरोपींनी कर्ज फेडलाच नाही.
या आरोपींनी केवळ कागदोपत्री व्यवहार बँकेला दाखवून बँकेची फसवणूक केली. या फसवणुकीत बँकेत दिलेल्या कागदपत्रांमध्ये इतर कंपन्यांच्या नावांचा वापर केल्याची माहिती पोलिस तपासात उघडकीस आली आहे.
बँकेची फसवणूक
या गैरव्यवहारात ट्रायसोन मेटालेक्स प्रा. लि. या कंपनीचे संचालक भवरलाल भंडारीला ७० कोटी रुपये मिळाल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्याच्या स्वाक्षरीही काही कागदपत्रांवर दिसून आल्या आहेत. त्याचप्रमाणे गैर व्यवहारातील ५० कोटींची रक्कम सूर्य किरण फेरा अलॅय प्रा. लि. या कंपनीचे संचालक गोरागांधी यांच्यामार्फत मिळवल्याचा आरोप आहे. त्यामध्ये काही नावे पुढे येत आहे.
तुर्तास पोलिसांनी या घोटाळ्यात सहभागी असलेल्या तिघांना अटक केली असून त्यापैकी भवरलाल हा वरळीत राहतो. तर गोरागांधी ग्रँटरोडचा रहिवासी आहे. तर तिसरा आरोपी कमलेश हा प्रभादेवी परिसरात रहात असल्यची माहिती पोलिसांनी दिली आहे.
१२ मे २०१७ रोजी हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या गैरव्यवहारात पारेख एल्युमिनेक्स लिमिटेडचे संचालक अमिताभ पारीख, राजेंद्र गोठी, देवांशू देसाई, किरण पारेख आणि विक्रम मोर्दानी यांची नावंही पुढे आली असून यातल अमिताभ याचा २०१३ मध्ये मृत्यू झाला, तर उर्वरित आरोपींवर अटकेची टांगती तलवार लोंबकळत आहे.