आर्किटेक्चर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची अलिबाग महानगर दंडाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. या निर्णया विरोधात उच्च न्यायालयाने रिपब्लिक वाहिनीचे मुख्यसंपादक अर्णब गोस्वामी यांनी निर्णयाला आवाहन देण्याची मागणी केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही अर्णबकडून केली आहे.
राज्य सरकारने याच जमिनीच्या मालकीहक्कावरून सुरू असलेल्या वादाप्रकरणी अर्ज करून ही जागा कारशेडसाठी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ही बाब आरे येथील कारशेडविरोधात याचिका करणाऱ्या झोरू भथेना यांनी यावेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची कागदपत्रेही त्यांनी न्यायालयात सादर केली. ती पाहिल्यावर न्यायालयाने सरकारला त्याबाबत विचारणा केली. गरोडिया यांच्या जागेचा या जागेशी काहीही संबंध नसल्याचा दावा सरकारने केला. परंतु दोन्ही जमिनी सारख्याच असल्याचे भथेना यांनी सांगितल्यावर एकीकडे जागेचा ताबा देण्याच्या मागणीसाठी अर्ज करायचा आणि दुसरीकडे त्यावर निर्णय येण्याआधीच जागेचा ताबा परस्पर कारशेडसाठी देऊन टाकायचा, असे सुनावत न्यायालयाने सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.