लॉकडाऊन काळात अवैध वाहतूक करणाऱ्या ८० हजार ५३२ जणांची वाहनं जप्त

लाँकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात १ लाख २३ हजार गुन्हे नोंदवलेले आहेत.

लॉकडाऊन काळात अवैध वाहतूक करणाऱ्या  ८० हजार ५३२ जणांची वाहनं जप्त
SHARES
लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली, तरी पूर्णतहा लाँकडाऊन उठवलेला नाही, त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांनो सावधान, अवैध वाहतूकीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८० हजार ५३२ जणांची वाहने आतापर्यंत जप्त केलेली आहेत. तर लाँकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात १ लाख २३ हजार गुन्हे नोंदवलेले आहेत.

लाँकडाऊनमध्येे शिथिलता देताच, नागरिक सोमवारी मोठ्या संख्येने वाहने घेऊन रस्त्यावर गर्दी करताना आढळून आले. बहुदाा राज्यशासनाच्या अटीचा त्यांना विसरच पडला असावा. दरम्यान अशा बेजबाबदार नागरिकांविरोधात पोलिसांनी आता कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते ७ जून  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख २३ हजार ६३७ गुन्हे नोंद झाले असून २३,८९३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ६ कोटी ७८ लाख ०९ हजार ८९१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख ६० हजार ३१८ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख ८६ हजार व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
    
कडक कारवाई
 कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २६२ घटना घडल्या. त्यात ८४५ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

मदतीसाठी १ लाख फोन
पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,००,६८७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ७१८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,८६,९६७ व्यक्ती Quarantine  आहेत. अशी माहिती गृहमंञी अनिल देशमुख यांनी दिली.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८०,५३२ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 

पोलिस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील २० पोलीस व १ अधिकारी अशा एकूण २१, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा ३४ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १९६ पोलीस अधिकारी व १२४१ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात सध्या एकूण ३१० रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास १६,७२८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा