'व्हाॅट्स अॅप ग्रुप'वर कोरोना संबधित मेसेज करू नका फाॅरवर्ड, पोलीस आहेत लक्ष ठेवून


'व्हाॅट्स अॅप ग्रुप'वर कोरोना संबधित मेसेज करू नका फाॅरवर्ड, पोलीस आहेत लक्ष ठेवून
SHARES
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नवनवीन अफवा सोशल मिडियावर पसरवल्या जात आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी मुंबईच्या सायबर पोलिसांनी आता कडक पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहेत. व्हॉटस अँपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्या ग्रुपच्या अँडमिनवर आता कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे आपण जर कोणत्या व्हाँट्स ग्रुपचे अँडमिन असाल तर त्वरित सेटिंगमध्ये जाऊन संबधित ग्रुपच्या सेटींगमध्ये जाऊन त्या ग्रुपवर तुम्हीच फक्त मेसज करू शकता, असे सेटींग करा असे आवाहन केले आहे.

मुंबईत सध्या सोशल मिडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी फास आवळला आहे. आता पर्यंत मुंबई पोलिसांनी अशा समाजकंटकांवर 25 गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यात 18 जणांना अटक केली आहे.  महाराष्ट्र सायबर पोलिस सध्या टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.  सायबर पोलिसांनी राज्यातील विविधपोलिस ठाण्यात नवीन 419 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात 223 जणांना पोलिसांनी अटक केली असून 157 जणांचा
पोलिस शोध घेत आहेत.


मार्च महिन्यात डि.एन.नगर पोलिसांनी अशाच अफवा पसरवल्या प्रकरणी कांदीवलीतील एका व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला. या व्यावसायिकाने कोरोनामुळे एका डाँक्टरचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी आणि मुलगी ही कोरोनाने ञस्त असल्याच्या आशयाचा मेसेज सोशल मिडियीवर पसरवला होता. मुंबई सायबर पोलिसांनी आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप (12), फेसबुक (5), ट्विटर (1), टिकटँाक (5) आणि अन्य सोशल मीडिया (२) च्या माध्यमातून बनावट बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. तर राज्य सायबर पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप (175), फेसबुक (165), ट्विटर (8), इन्स्टाग्राम (4), टिकटोक (20) आणि इतर सोशल मीडिया ( 47) वर पसरलेल्या बनावट बातम्या किंवा अफवा पसरवल्याची प्रकरणे नोंदवली गेली.


पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक गुन्ह्यात  ग्रुपमधील उपद्रवींकडून पसरवण्यात आलेल्या अफवांना ग्रुप अँडमिनला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच व्हाँट्स अँप ग्रुप अँडमिना सध्याच्या पार्श्वभूमिवर त्याच्या ग्रुपमधील सेटींगमध्ये जाऊन ज्या ग्रुपला ते  अँडमिन आहेत. त्या ग्रुपवर फक्त तेच मेसेज टाकू शकतील अशी सेटींग करण्याचे आवाहन बैजल यांनी केले आहे.

  सतर्कता बाळगावी

सध्या या लॉकडाऊनच्या काळात काही नवीन प्रकारच्या  सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे . कोणत्या ही वस्तूंची ऑनलाईन  ऑर्डर करताना, बऱ्याचदा एका खोट्या संकेत स्थळावर (website ) वर तुम्हाला डायरेक्ट केले जाते व मोबाईल नंबर विचारला जातो आणि मोबाईल नंबर एंटर केल्यावर एक कॉल येतो व त्या संकेतस्थळावरील (website ) एक फॉर्म भरायला सांगितलं जातो ज्यामध्ये बँक अकॉउंटचे सर्व डिटेल्स,क्रेडिट/ डेबिट कार्ड ची सर्व माहिती विचारली जाते .त्यांनतर फोन वरील व्यक्ती आपल्या मोबाइलवर येणारा  otp कन्फर्म (confirm) करायला सांगते आणि कॉल डिस्कनेक्ट होतो व काही वेळात ग्राहकाला आपल्या बँक खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचा मेसेज येतो सर्व नागरिकांनी अशी online खरेदी करताना सतर्कता बाळगून आपले कोणतेही बँक डिटेल्स शेअर करू नयेत व असे काही घडल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर बँकेला तात्काळ कळवून आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी ,तसेच सदर गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर (website ) पण कळवावी .

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा