मुंबईत नियम पायदळी तुडवणाऱ्या 10 हजार 408 जणांवर गुन्हे दाखल


मुंबईत नियम पायदळी तुडवणाऱ्या 10 हजार 408 जणांवर गुन्हे दाखल
SHARES
मुंबईत सध्या कोरोना या संसर्ग रोगाने हाहाकार माजवला आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न करत सर्वञ लाँकडाऊन केले आहे. असे असताना, शहरात बेजबाबदार नागरिकांकडून माञ नियम पायदळी तुडवण्याचे प्रमाण काही कमी होत नाही. पोलिसांनी लाँकडाऊनच्या काळात आतापर्यंत 10 हजार 408 जणांवर आतापर्यंत गुन्हे नोंदवले आहेत.
 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लाँकडाऊन पुकारण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी गरजे व्यतिरिक्त बाहेर पडू नये, पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकञ जमू नये, तसेच तोंडाला मास्क वापरणे सक्तीचे केले असताना. काही बेशिस्त नागरिक आज ही या नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांमुळेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अडचणी येत असल्याचे अनेक उदाहरणातून दिसून आले आहे. मुंबईत सध्या कोरोना या संसर्ग रोगामुळे आतापर्यंत 270 जणांचा बळी गेला आहे. असे असताना ही, बेजबाबदार नागरिकांकडून काही नियमांचे पालन होत नसल्यामुळे पोलिसांनी अशांवर कारवाई करण्यास सुरूवात केली.

पोलिसांनी या पूर्वीच नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर
आतापर्यंत 10 हजार 408 गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत 6 हजार 513 जणांना अटक करून त्याची जामीनावर मुक्तता केली आहे. तर 1234 जणांचा पोलिस शोध घेत आहेत. 2661 जणांना पोलिसांनी आतापर्यंत नोटीस दिल्या आहे. माञ या सर्वांमध्ये सर्वात बेजबाबदार म्हणून मास्क न लावणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

पोलिसांनी मास्क न लावणाऱ्यांविरोधात 18 एप्रिल पासून कारवाई सुरू केली. अवघ्या दहा दिवसात पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या 1238 जणांवर गुन्हा नोंदवला आहेत.  पश्चिम आणि मध्य मुंबईत मास्क न लावणाऱ्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी दिवसभरात पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या 40 जणांवर कारवाई केली आहे. सरकारकडून वेळोवेळी सांगून समाजसेवी संस्थांनी मास्कचे वाटप करून सुद्धा ही महामारी पसरवण्यास मदत करणाऱ्या अशा बेजबाबदारांना पोलिस चांगलाच खाकीचा धाक दाखवताना दिसत आहेत.



या पूर्वीच Covid -19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं आज मास्क वापरणं अनिवार्य करणं तसंच थुंकण्यावर पूर्ण बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही मास्कचा वापर अनिवार्य आहे. ५ पेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर सरकारनं यापूर्वीच बंदी घातली आहे.
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा