त्यांना करायची होती मित्राचीच हत्या!


त्यांना करायची होती मित्राचीच हत्या!
SHARES

आपापसांतील वादातून मित्राचीच गोळ्या घालून हत्या करण्यासाठी निघालेल्या दोघा तरूणांना पोलिसांनी कांजूरमार्ग परिसरातून अटक केली आह. या दोघांकडून एक गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. सागर सर्जेराव गायकवाड आणि अमोल अर्जुन साळवे अशी या दोघांची नावे आहेत.

कांजूरमार्गच्या अशोक नगर विद्युट टॉवर जवळील सिद्धार्थ रहिवाशी संघात सागर आणि अमोल हे दोघे राहतात. नुकताच या दोघांचा काही जणांशी वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, या दोघांनी त्यांचा काटा काढायचे ठरवले. त्यानुसार गावठी कट्टा आणि काडतूस घेण्यासाठी हे दोघे कांजूरमार्ग परिसरात येणार होते.

सोमवारी पहाटे हे दोघे कांजूरमार्ग परिसरात फिरत असताना पोलिसांना त्याच्या हालचालींवर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याना हटकले असता ते पोलिसांना पाहून पळू लागले. पोलिसांनी या दोघांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्या झडतीत पोलिसांना गावठी कट्टा आणि दोन काडतुसे सापडली. पोलिसांनी सागरकडे केलेल्या चौकशीत त्याने आपल्याशी वाद घालणाऱ्या घराजवळील मित्राची हत्या करण्यासाठी शस्त्र बाळगल्याची कबुली दिली. या दोघांनी हे शस्त्र कोणाकडून घेतले? याचा पोलिस शोध घेत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा