पालघर : कुटुंबातील तिघांची राहत्या घरातच हत्या

पालघर जिल्ह्यातील वाडा तहसीरमधील नेहेरलोई गावात ही घटना घडली.

पालघर : कुटुंबातील तिघांची राहत्या घरातच हत्या
SHARES

शुक्रवारी एकाच कुटुंबातील तीन जणांची राहत्या घरात हत्या (murder) करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्टच्या सुमारास ही हत्या झाल्याचा संशय आहे. पालघर (palghar) जिल्ह्यातील वाडा तहसीरमधील नेहेरलोई गावात ही घटना घडली. 

मुकुंद बेचरदास राठोड (75), त्यांची पत्नी कांचन (72) आणि त्यांची अविवाहित आणि मुलगी संगीता (52) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने गुन्हा केल्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावले आणि घरात कोणीच नसल्याचे भासवले.

राठोड यांचा मुलगा पंकज (43) हा विरार (virar) पश्चिम येथे राहतो. तो एका खासगी कंपनीत काम करतो. त्याने 17 ऑगस्ट रोजी वडिलांना फोन केल्यानंतर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हे प्रकरण उघडकीस आले. 

काही दिवसांपासून पंकज त्यांना फोन करत होता. पण त्यांचा फोन बंद असल्याचे आढळले. शुक्रवारी संध्याकाळी पंकजने त्याच्या नातेवाईकासह वाड्यापासून 28 किमी अंतरावर असलेल्या नेहरोली गावात आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.

घरी आल्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावलेले दिसले. त्यानंतर पंकज व त्याच्या नातेवाईकाने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आणि कुटुंबातील सदस्यांचे कुजलेले मृतदेह आढळून आले.

कांचन आणि तिची मुलगी संगीता या दोन महिलांचे मृतदेह बेडशीटने झाकलेल्या लाकडी ट्रंकमध्ये ठेवण्यात आले होते, तर मुकुंदचा मृतदेह त्यांच्या स्नानगृहाजवळ एका छोट्या जागेत पडला होता आणि तोही कपड्यांनी झाकलेला होता, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांची हत्या कशी झाली हे सांगणे कठिण होऊ शकते. कारण मृतदेह कुजलेले आहेत आणि पोस्टमॉर्टम अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

वाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103(1) (हत्या) आणि 238 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.



हेही वाचा

MMR मधील पहिला डबल डेकर फ्लायओव्हर प्रवाशांच्या सेवेत

मुंबई : महारेरा वेबसाईट दोन दिवस बंद राहणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा