Advertisement

coronavirus update: राज्यात कोरोनाचे ५००० रुग्ण बरे

आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची विक्रमी नोंद राज्याचा नावावर झाली आहे.

coronavirus update:  राज्यात कोरोनाचे ५०००  रुग्ण बरे
SHARES

आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची विक्रमी नोंद राज्याचा नावावर झाली आहे. जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.

सोमवारी ठाणे येथील २०९ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. पुणे येथील १६१ मुंबईतल ५५, रायगड येथील ५३ औरंगाबाद येथील ४३ अशा प्रकारे राज्यभरात ५८७ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. मंगळवारी बरे होणाऱ्यांमध्ये ३०० हून अधिक रुग्णांची भर पडल्याने राज्यभरात ५००० रुग्ण बरे झाले आहेत.

डॉक्टरांच्या उपचाराला आणि रुग्णांच्या इच्छाशक्तीला यशस्वी करण्यातील सर्वात महत्वाचा दुवा परिचारिका ठरत असून रुग्णाची  शुश्रुषा करुन त्याला बर करण्यासाठी त्या परिश्रम घेत आहेत. कोरोनाच्या लढ्यात रुग्णांना बरं करण्यासाठी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा देऊन अहोरात्र झटणाऱ्या, हिमतीने लढणाऱ्या सर्व परिरचारीकांना आरोग्यमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय  परिचारीका दिनाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या. 

हेही वाचा - Coronavirus Pandemic: मुंबईत कोरोनाचे 426 नवे रुग्ण दिवसभरात 28 जणांचा मृत्यू

उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरच आरोग्यमंत्र्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांचं देखील अभिनंदन केलं आहे. समाजात कोरोनामुळे भीतीचं वातावरण असताना रुग्ण बरे होत आहेत ही सकारात्मक बाब पुढे येत असल्याने भीतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

लक्षणीय बाब म्हणजे गेल्या आठवड्यात सोमवारी पहिल्यांदाच ३५० रुग्णांना घरी सोडल्यानंतर बरोबर एक आठवड्यानंतर पुन्हा एकदा विक्रमी संख्येत रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत. सोमवारी ११ मे रोजी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५५, ठाणे २०९, रायगड ५३ असे मुंबई मंडळात एकूण ३२१ रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत एकूण ३१६० रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. 

पुणे १६१ तर सातारा येथील १४ असे पुणे मंडळात एकूण १७५ रुग्णांना घरी सोडले तर आतापर्यंत एकूण ११४६ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. नाशिक मंडळात आतापर्यंत एकूण १३४ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. कोल्हापूर मंडळात आतापर्यंत एकूण ४२ रुग्णांना, औरंगाबाद मंडळात एकूण ११७, लातूर मंडळात एकूण १२, अकोला मंडळात एकूण १०१ तर नागपूर मंडळात आतापर्यंत एकूण ७४  रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.

 हेही वाचा - चिंताजनक! राज्यात कोरोनाचे 1026 नवे रुग्ण, तीन दिवसात 142 जणांचा बळी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा