दहावी बोर्डाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. बोर्डानं उत्तीर्ण झालेल्यांची विभागनिहाय सरासरी निकालांची आकडेवारी जारी केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, यात सर्वाधिक १००% निकाल कोकण विभागाचा आला आहे. तर सर्वात कमी असला तरीही नागपूर विभागातील ९९.८४% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बोर्डानं जारी केलेल्या सरासरी आकडेवारीनुसार, या वर्षी सुद्धा विद्यार्थिनींनी ०.०२ टक्क्यानं बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी ९९.९४% लागला आहे. तर विद्यार्थिनींचा निकाल ९९.९६% आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ९७.८४% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सन २०२१ च्या इयत्ता दहावीत एकूण मुले - ९ लाख ९ हजार ९३१ प्रविष्ट होते, तर मुली - ७ लाख ७८ हजार ६९३ असे एकूण - १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी प्रविष्ट होते. एकूण आठ माध्यमानुसार विद्यार्थी प्रविष्ट आहेत. राज्य मंडळ स्तरावर ३ जुलै २०२१ ते १५ जुलै २०२१ अखेर या दरम्यान मंडळामार्फत निकाल तयार करण्यात आले होते.
यंदा करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात (Maharashtra Board) प्रथमच अशा पद्धतीने परीक्षा अशा पद्धतीने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात आले आणि निकाल जाहीर करण्यात आला.
हेही वाचा