Advertisement

Best Of Luck: मंगळवारपासून सुरू होणार १०वीची परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला मंग‌ळवार ३ मार्च रोजी सुरुवात होणार आहे.

Best Of Luck: मंगळवारपासून सुरू होणार १०वीची परीक्षा
SHARES
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला मंग‌ळवार ३ मार्च रोजी सुरुवात होणार आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या या परीक्षेत १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. 

गेल्या वर्षी दहावीचा निकाल ७० टक्के घसरला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना यंदापासून पुन्हा अंतर्गत गुण देण्यास सुरू करण्यात आले आहे. ८० गुण लेखी परीक्षेसाठी; तर २० गुण अंतर्गत परीक्षेसाठी असणार आहेत.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रश्नप्रत्रिकेचे स्वरूप कृतिपत्रिकेप्रमाणे राहणार आहे. यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांवर भर देण्यात आला आहे. राज्यात ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. भाषा विषयाच्या पेपरपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ मुले व ७ लाख ८९ हजार ८९४ मुली आहेत.

राज्यातील ९ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा होणार आहे. यंदाच्या परीक्षेत ९ हजार ४५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांना सरकारी निर्णयाप्रमाणे सुविधा दिल्या जाणार आहेत. यंदा राज्यातून ११० तृतीयपंथी दहावीची परीक्षा देणार आहेत. राज्यात एकूण ४९७९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्यापैकी ८० संवेदनशील केंद्रे घोषित करण्यात आली आहेत. या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वेळापत्रकामध्ये बहुतांश विषयांच्या परीक्षेदरम्यान खंड ठेवण्यात आलेला आहे. मंडळामार्फत प्रसिद्ध व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे. अन्य वेबसाइटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले; तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. परीक्षेबाबतची सविस्तर माहिती http://www.mahahsscboard.in/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

एकूण २७३ भरारी पथकांसोबतच बैठे पथक आणि विशेष महिला भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा कक्षात अर्धा तास अगोदर उपस्थित असणे आवश्यक आहे. एका वर्गात २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सीलबंद पाकिट याप्रमाणे पाकिटे देण्यात येणार आहेत. हे पाकीट पर्यवेक्षक आपल्या परीक्षा कक्षातील २ विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन व त्यानंतर स्वत:ची स्वाक्षरी घेऊन उघडणार आहेत.

विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या परीक्षेसाठी विभागात १०२४ परीक्षा मुख्य केंद्रे असून ३७८५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा