राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी २४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २४ ऑगस्टला दुपारी १ वाजल्यापासून विद्यर्थ्याना ऑनलाइन पाहता येणार आहे.
बारावीच्या फेरपरीक्षेला मुंबई, ठाणे, पालघर या भागातून एकूण २९ हजार ३२० विद्यर्थी बसले होते. बारावीची फेरपरीक्षा १७ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. या फेरपरीक्षेसाठी बारावीच्या नियमित परीक्षेत नापास झालेल्या अनेक विद्यर्थ्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे.