शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार स्कूल बसचालकांची पार्श्वभूमी तपासणे, दर आठवड्याला त्यांची मद्यपान आणि औषध चाचणी करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेले हे नियम सर्व शाळांसाठी लागू करण्यात आले आहेत.
चालक, सफाई कामगार आणि महिला सेविकांची सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेस चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अनधिकृत व्यक्ती बसमध्ये प्रवेश करणार नाही. तसेच खासगी वाहनांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चालकाची ओळख व पार्श्वभूमी शाळेला कळवावी, अशी सूचनाही केली आहे.
पालकांनी चालकांची वैयक्तिक माहिती स्वतःकडे ठेवावी, यामध्ये चालकांची पार्श्वभूमी, ज्यामध्ये बेपर्वा ड्रायव्हिंग आणि भूतकाळातील अपघाताच्या घटनांचा समावेश असेल. खाजगी वाहतूक वापरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांनी शाळा व्यवस्थापनाला चालकाची पडताळणी तपशिलांची माहिती देणे आवश्यक आहे.
मुंबईत सध्या सुमारे 6,000 शालेय बस कार्यरत आहेत. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित झाल्याचे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.
हेही वाचा