मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ सीजन ९ चा सोमवारी शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. या शोच्या शुटिंगनंतर अमिताभ 'ऑफ एयर' होताच भावूक झाले. याचसोबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करून केबीसीच्या टीमचं अभिनंदन केलं.
T 2588 - And KBC draws to a close .. !! Penultimate day and the absence of all those connected to be away .. a sadness ! pic.twitter.com/Q7tCdg8fd1
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 22, 2017
अापल्या टीमचं अभिनंदन करताना अमिताभ म्हणाले, ''कौन बनेगा करोडपती’ या शोच्या टीमसोबत माझं घनिष्ट नातं जुळलं आहे. पण शुटींग संपल्यानं ही टीम आता माझ्यापासून लांब होणार आहे. त्यामुळे या टीममधील सर्वांचीच अनुपस्थिती मला सतावत राहील.''
अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती ९’ च्या टीमचे कठोर परिश्रम आणि उत्कटतेबद्ल अभिनंदन केलं आहे. अमिताभने अपल्या ब्लॉगमध्ये लिहलं आहे, ''केबीसी या शोची आता सांगता होणार असून त्याचे संकेत पूर्णपणे मिळत आहेत. या किचकट शोसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र परिश्रम केले नसते तर या शोला इतकी प्रसिद्धी मिळाली नसती.'' असंही ते म्हणाले.
हा शो ऑगस्ट २०१७ मध्ये 'ऑन एअर' झाला होता. सुरुवातीला हा शो टीआरपीमध्ये प्रथम क्रमांकावर होता. केबीसीच्या या ९ व्या सिजनमध्ये ७ कोटी रक्कम जिंकण्यात आतापर्यंत कोणत्याही कंटेस्टंटला यश मिळालेलं नाही. पण झारखंडमध्ये राहणाऱ्या अनिता यांनी १ कोटी रुपये जिंकत या सिझनच्या पहिल्या कोट्यधीश महिला बनण्याचा मान पटकावला.
हेही वाचा -
अमिताभ बच्चन यांचा 'स्पेशल डे'
केबीसीच्या सेटवर का भावूक झाले अमिताभ? वाचा