Advertisement

चिन्मयने खरोखरच उचललं अमृताला!


चिन्मयने खरोखरच उचललं अमृताला!
SHARES

जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जायचं झालं, आणि त्यातही जोडीनं दर्शनाला जायचं झालं, तर नवऱ्यानं बायकोला उचलून मंदिराच्या ४०० पायऱ्या चढण्याची प्रथा आहे. आता खरंच मंदिरात ही प्रथा किती पाळली जाते, हा जरी प्रश्न असला, तरी आपल्या 'घाडगे & सून' मालिकेत मात्र ही प्रथा अगदी तंतोतंत पाळली जाते. त्यामुळेच आपला अक्षय म्हणजेच चिन्मय त्याची मालिकेतली पत्नी अमृता अर्थात भाग्यश्रीला उचलून खरोरच मंदिराच्या ४०० पैकी ३०० पायऱ्या चढून गेला!


३०० पायऱ्या चढून गाठलं मंदिर!

त्याचं झालं असं, की मालिकेमध्ये घाडगेंच्या परंपरेनुसार अक्षय अमृताला घेऊन जेजुरीच्या दर्शनाला जातो असा सीन होता. त्यासाठी जेजुरीच्या पायथ्याशी ही सर्व मंडळी पोहोचली. आता तसं पहायला गेलं, तर फक्त सीनसाठी थोडावेळ उचलून नंतर पुन्हा शुटींग कंटिन्यू सुरु ठेवता आलं असतं. पण तो सीन अधिक वास्तविक वाटावा, म्हणून चिन्मयनं खरोखरच भाग्यश्रीला उचलून घेतलं! आणि थोड्याथोडक्या नाही, तर चक्क ३०० पायऱ्या चढून तो मंदिरात पोहोचला देखील!



अमृताच्या पायाला झाली दुखापत

मंदिराजवळ पोहोचल्यानंतर अमृताच्या पायाला लागल्यामुळे अक्षयने तिला उचलून घेतलं आणि ३०० पायऱ्या चढल्या. अक्षयच्या प्रेमात पडलेल्या अमृतासाठी मात्र हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरणार आहे. खंडोबाच्या दर्श्नासोबतच अक्षय-अमृताच्या लग्नाचा जागरण-गोंधळाचा विधीही पार पडणार आहे.


चिन्मय म्हणतो ही देवाचीच कृपा!

या जेजुरीच्या वारीबद्दल बोलताना चिन्मय म्हणाला, “जेजुरीला आमच्या संपूर्ण टीमवर देवाचीच कृपा झाली असं मी म्हणेन. शुटींग दरम्यानची मज्जा वैगरे नेहमीच असते. पण आम्हाला ती जागा अलौकिक वाटली! मी भाग्यश्रीला उचलून तब्बल ३०० पायऱ्या चढलो. माई म्हणजे सुकन्या ताई देखील आमच्याबरोबर होत्या. आमचं पूर्ण युनिट पायऱ्या चढून वर गेलो. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी सगळे त्याच जोमाने शुटींगला हजर होते. आता याला काय म्हणावे? “देवाचीच कृपा!”.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा