Advertisement

कंगनाचा महापालिकेविरोधात २ कोटीचा दावा

मुंबईतील पाली हिल इथल्या कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर कंगनानं पालिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

कंगनाचा महापालिकेविरोधात २ कोटीचा दावा
SHARES

अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई महापालिकेविरोधात दोन कोटी रुपयांचा दावा केला आहे. मुंबईतील पाली हिल इथल्या कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर कंगनानं पालिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २२ सप्टेंबर रोजी या प्रकरणावर हायकोर्यात सुनावणी होणार आहे.

कारवाईविरोधात संतापलेल्या कंगनानं मुंबई महापालिकेला पुन्हा हायकोर्टात आव्हान दिलं. मुंबई महापालिकेच्या बेकायदेशीर कारवाईदरम्यान दुर्मिळ सामानांचं, वस्तूंचं नुकसान झाल्याचा आरोप कंगनानं केला आहे. एकूण मालमत्तेच्या ४० टक्के भागाचं नुकसान झाल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला गुरुवारपर्यंत म्हणजेच १७ सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तर पुढील आठवड्यात मंगळवारी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

कंगनाला वांद्रे इथल्या तिच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 8 सप्टेंबर रोजी मुंबई महानगरपालिका कायद्यातील कलम 354(अ) नुसार नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी कंगनाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती.

पण, तिच्याकडून कोणतंही उत्तर न आल्यानं पालिकेकडून 9 सप्टेंबर रोजी सकाळी तोडकाम करण्यात आले. कंगनाच्या कार्यालयात १२ अनधिकृत बांधकामं असल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केला होता. त्याला विरोध करत कंगनानं अॅड. रिझवान सिद्दीकीमार्फत हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. यानंतर कारवाईला स्थगिती मिळाली.



हेही वाचा

"गळफास घेतलेल्या अवस्थेत अभिषेक आढळला तर?" कंगनाचा जया बच्चन यांना प्रश्न

सगळ्या गँगशी आदित्य ठाकरे यांची जवळीक, कंगना रणौतचा आरोप

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा