Advertisement

‘कट्टी बट्टी’ने ठोकलं शतक

‘कट्टी बट्टी’ या मालिकेने १०० भागांचा टप्पा गाठत शतक ठोकलं आहे. अहमदनगरमध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' या मालिकेत पाहायला मिळत आहे.

‘कट्टी बट्टी’ने ठोकलं शतक
SHARES

झी युवा वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘कट्टी बट्टी’ या मालिकेने १०० भागांचा टप्पा गाठत शतक ठोकलं आहे. अहमदनगरमध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' या मालिकेत पाहायला मिळत आहे.

१४ जून रोजी या मालिकेनं पहिला यशस्वी १०० एपिसोडचा टप्पा पूर्ण केला. हा आनंद ‘कट्टी बट्टी’च्या संपूर्ण टिमने एकत्र येऊन केक कापून साजरा केला.

प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. या मालिकेची संपूर्ण टीम म्हणजे आमचं विस्तारित कुटुंबच आहे. त्यांच्यासोबत हा आनंद साजरा केला. कारण यामागे प्रत्येकाची मेहनत आणि चिकाटी आहे.
अश्विनी कासार, अभिनेत्री

या आनंदाच्या क्षणी बोलताना पुष्कर सरदने सांगितलं की, "१०० एपिसोडचा टप्पा गाठल्यामुळे आम्हा सर्वांना आनंद झाला आहे. त्यासाठी मला आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आणि आमच्या ‘कट्टी बट्टी’ या मालिकेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार.”

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा