Advertisement

'राधा प्रेम रंगे रंगली' मालिकेने गाठला १०० भागांचा पल्ला


'राधा प्रेम रंगे रंगली' मालिकेने गाठला १०० भागांचा पल्ला
SHARES

'राधा प्रेम रंगी रंगली' ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत आपल्या कुटुंबावर निस्वार्थीपणाने प्रेम करणाऱ्या राधाने आपल्या सोज्वळ स्वभाव आणि नाजूक बोलण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तर १३ वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सचित पाटील म्हणजेच प्रेम याचा सहज अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच या मालिकेने १०० भागांचा पल्ला गाठला आहे.

या मालिकेतील सर्वच कलाकारांनी १०० एपिसोड पूर्ण झाल्यामुळे मोठया उत्साहात सेटवर केक कापत आनंद साजरा केला. याचबरोबर मालिकेमध्ये येत्या काही भागांमध्ये बरेचसे ट्वीस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्रावणी काकुच्या वारंवार अन्विताला घालून पाडून बोलण्याला कंटाळून आदित्यने तिला घराबाहेर काढलं आहे. आता श्रावणी काकू परत घरी येणार का? पुढे काय होणार? श्रावणी काकू घरी परतणार का? दीपिका प्रेमला आपलंस करण्यासाठी कोणती खेळी खेळणार हे बघणं रंजक ठरणार आहे.

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेचे गेल्या काही आठवड्यापासून शूट सुरू आहे. ज्यामध्ये आमच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. एक मालिका यशस्वी होण्यामागे संपूर्ण टीमची मेहनत असते. आम्ही कलाकार प्रेक्षकांना रोज भेटतो पण, स्पॉट दादा, टेक्निकल टीम, आमचे दिग्दर्शक हे पडद्यामागचे जे खरे कलाकार आहेत जे दिवस रात्र मेहेनत घेतात त्यांचे कौतुक आहे, हे सगळे हा शिवधनुष्य खूप छान पेलत आहेत. रसिक प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आज आम्ही १०० एपिसोड पूर्ण केले आहेत, असेच प्रेम आमच्या संपूर्ण टीमवर करत रहा ईतकीच इच्छा
- सचित पाटील अभिनेता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा