Advertisement

‘स्वराज्यरक्षक संभाजी’मध्ये संभाजीराजे-दिलेर खान प्रकरणाचा पेच?


‘स्वराज्यरक्षक संभाजी’मध्ये संभाजीराजे-दिलेर खान प्रकरणाचा पेच?
SHARES

झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही होत आहे. यात आता संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचं समजल्या जाणाऱ्या दिलेर खान या प्रकरणाचा छडा लवकरच लागणार आहे.


नेमकं काय घडलं ?

संभाजी महाराजांचं दिलेर खानाकडे जाणं याबाबत इतिहासकारांमध्येही अनेक मतमतांतरं आहेत. वेगवेगळ्या नाटक, कादंबऱ्यांमधून वेगवेगळं चित्र रंगवण्यात आलं आहे. अनेकांना वाटतं की शिवाजी महाराजांवर चिडून संभाजीराजे गेले होते... काहींनी लिहिलंय की स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करायला गेले... मला इथे संधी मिळत नाही, तर तिथे जाऊन कर्तृत्व गाजवतो. एकूण संभाजीराजांचं बंड अशा पद्धतीने या घटनेकडे पाहिलं गेलं आहे. यामुळे त्यावेळी नेमकं काय घडलं याबाबत विविध विचार आहेत. असं असताना ‘स्वराज्यरक्षक संभाजी’मध्ये काय दाखवलं जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.


नि:पक्षपातीपणे खरा इतिहास

आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेच. खरा इतिहास टप्प्याटप्प्याने समोर आणणाऱ्या या मालिकेत हे प्रकरण कशा पद्धतीने दाखवण्यात येईल हे बघणं कुतूहलाचं ठरणार आहे. या मालिकेनं नेहमीच समज-गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नि:पक्षपातीपणे खरा इतिहास दाखवला आहे. मग ते गोदावरीचं प्रकरण असो, वा कलावंतीणीचं गाणं ऐकण्याचं... या सर्व गोष्टी मोठ्या शिताफीनं हाताळत खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून होतो आहे.

आता संभाजीराजे-दिलेर खान प्रकरण हा फार मोठा पेच मालिकेत आला आहे. हा पेच आता कसा सुटणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. या महिन्यात याचा उलगडा होणार आहे.




हेही वाचा -

लक्ष्मी-मल्हारच्या नव्या नात्याची सुरुवात!

संजयचा ‘लकी’ येतोय...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा