Advertisement

गुढी पाडव्याला राणा अंजली घरी परतणार, तर राधिका गुरुसोबत उभारणार गुढी


गुढी पाडव्याला राणा अंजली घरी परतणार, तर राधिका गुरुसोबत उभारणार गुढी
SHARES

मुंबई -  मराठी नववर्षाची सुरुवात होते ती गुढीपाडव्याने. वर्षातला पहिला सण. मराठी  मालिकांमध्येही प्रत्येक सन साजरा केल्याचे आपण पाहत आलोय. आपल्या आवडत्या मालिकांमध्येही आपण गुढीपाडवा साजरा करताना पाहणार आहोत. आपल्या आवडीच्या जोड्या राणा-अंजली आणि राधिका-गुरुनाथ यांच्याही घरी गुढी उभारण्यात येणार आहे आणि याचवेळी या मालिकांमध्ये नवं वळणही आलेलं पाहायला मिळणार आहे. हे भाग गुढीपाडव्याच्या दिवशी प्रसारीत होणार आहेत.

तुझ्यात जीव रंगला मधील राणा-अंजली त्यांच्या घरी परतणार आहेत. राणा आणि अंजली या दोघांचं नुकतंच लग्न झालं. परंतु लग्नानंतर राणाने आपल्या संसाराची सुरुवात शेतातील घरात करण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्याच्या या निर्णयामागे वहिनीचं कारस्थान होतं. ज्याला राणा बळी पडला होता. राणाने थोरल्या सुनबाईसह घरी परतावं यासाठी राणाचे आबा प्रतापराव आणि गोदाक्का दोघेही विविध प्रकारे प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला आता यश येणार असून, राणा आणि अंजली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरी परतणार आहेत.

मालिकेतील या नव्या वळणाबद्दल राणा म्हणतो की, लग्नानंतरचा हा आमचा पहिलाच गुढीपाडवा आहे. आमच्या संसाराची सुरुवातच वेगळ्या प्रकारे झाली. आमचं राहतं घर सोडून मी अंजलीबाईंना घेऊन शेतातील घरात संसार सुरु केला होता आणि त्यांनी तिथेही माझी साथ दिली. आम्ही घरी परत यावे ही सर्वांचीच इच्छा होती आणि या गुढीपाडव्याला ती पूर्ण होणार आहे. मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर आम्ही घरी परतणार आहोत. माझ्यासाठी आबांचा आणि गोदाक्काचा आनंद महत्त्वाचा आहे. एकत्र कुटुंबात राहण्याची अंजलीबाईंची सुद्धा इच्छा होती त्यांची इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. या सगळ्यात कुणीच दुखावणार नाही याचीही काळजी मला घ्यायची आहे आणि तसा पूर्ण प्रयत्न मी करणार आहे. या गृहप्रवेशाबद्दल अंजली म्हणते की, लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहणं हे कोणत्याही मुलीचं स्वप्न असतं. आता या गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझंही हे स्वप्न पूर्ण होणार आहे. मला घरातील सर्व लोकांची काळजी घ्यायची आहे आणि सर्वांना प्रेम द्यायचं आहे. एक थोरली सून म्हणून सर्वांच्या माझ्याकडून  खूप साऱ्या अपेक्षा आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत.

तर दुसरीकडे 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिकाही आता एका रंजक वळणावर आली आहे. शनायाला शह देण्यासाठी आणि गुरुनाथला परत मिळवण्यासाठी राधिका  प्रयत्न करतेय आणि त्यात तिला यशही मिळत आहे. कोणताही सण किंवा समारंभ असो तो कुटुंबासमवेत साजरा करणे हा राधिकाचा स्वभाव. जरी शनाया राधिकाच्या हक्काच्या घरात ठाण मांडून बसली असली तरी हा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे आपल्याच घरात साजरा करणार असा निर्णय राधिका घेते. गुढीपाडव्याच्या दिवशी छान सजून राधिका घरी पोहोचते आणि गुरुनाथलाही यासाठी तयार करते. यावेळी नेहमीप्रमाणे शनाया विरोध करते परंतु राधिका तिच्याकडे दुर्लक्ष करत गुरुसोबत गुढी उभारते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा