कालिना - मुंबई विद्यापीठात 18 ऑक्टोबरला आयोजित केलेल्या परंपरा महोत्सवाची गुरुवारी सांगता झाली. हा महोत्सव 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर उपस्थित होते. या वेळी आपली संस्कृती ही भावी पिढीला समजली पाहिजे आणि ती आपण जपली पाहिजे असं सांगण्यात आलं. या समारोपाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख ही उपस्थित होते.