Advertisement

मुंबईला उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार?

गेल्या वर्षी, २९ मार्च रोजी सर्वाधिक किमान तापमान २४.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. गेल्या दशकात मार्चमधील सर्वोच्च किमान तापमान २०२० मध्ये २६ अंश सेल्सिअस होते.

मुंबईला उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार?
SHARES

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबईतील दोन्ही वेधशाळांनी बुधवारी, १६ मार्च आणि गुरुवार, १७ मार्च रोजी कमाल तापमानात किंचितशी घट नोंदवली आहे. तज्ञांनी सुचवलं आहे की, शहरातील उष्णतेच्या लाटांची तीव्रता कमी झाली आहे.

१७ मार्च, सांताक्रूझ इथं दिवसाचे कमाल तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांनी ३७.५ अंश सेल्सिअसवर राहिले. बुधवारी देखील इतकिच नोंद करण्यात आली होती. तर, कुलाबा इथं ३३ अंश सेल्सिअसची नोंद झाली. तर १६ मार्चला याच परिसरात ३४.८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, रात्रीचे किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहिले. IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेत, किमान तापमान २३.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा दोन अंश जास्त होते.

दुसरीकडे, डॉ. संदीप पाटील, फोर्टिस हॉस्पिटल, कल्याणचे मुख्य अतिदक्षता तज्ज्ञ म्हणाले: “पुढील दोन दिवसांत तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर या जिल्ह्यांतील उष्णतेची लाट एक-दोन दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे. सामान्य स्थितीत मानवी शरीराचे तापमान कमी करण्यासाठी घाम येतो. उष्णतेच्या लाटेच्या बाबतीत, शरीराचे मुख्य तापमान वाढते, कारण सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहणे किंवा उच्च तापमानात शारीरिक श्रम करणे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान १०४F (४० अंश सेल्सिअस) किंवा त्याहून अधिक वाढते तेव्हा उष्माघात होतो - ही परिस्थिती उन्हाळ्याच्या महिन्यांत सर्वात सामान्य असते.”

ते पुढे म्हणाले की, “उष्मा संपुष्टात येण्याच्या काही सामान्य लक्षणांमध्ये शरीराचे उच्च तापमान, मळमळ, बदललेली मानसिक स्थिती, घामाच्या पद्धतींमध्ये बदल, वेगानं श्वास घेणे आणि तीव्र डोकेदुखी यांचा समावेश होतो. उष्णतेचा थकवा टाळता येण्याजोगा आणि क्वचितच जीवघेणा असला तरी, उपचार न केलेला उष्माघात तुमच्या मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि स्नायूंना त्वरीत नुकसान करू शकतो. जेव्हा उपचारास उशीर होतो तेव्हा नुकसान अधिक वाढते, गंभीर गुंतागुंत किंवा मृत्यूचा धोका वाढतो."



हेही वाचा

महाराष्ट्रात ४ वर्षांत २ लाख झाडे बेकायदेशीरपणे तोडली

माटुंगा, वडाळाला पुराचा तर चेंबूर, गोवंडीला उष्णतेचा धोका: MCAP

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा