Advertisement

मुसळधार पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा स्कायमेटनं वर्तवला आहे.

मुसळधार पावसाची शक्यता, शेतकरी चिंतेत
SHARES

राज्यात कोरोना व्हायरसचं एकीकडे थैमान सुरू आहे. त्यात हवामानत होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट ओढवलं आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे हवामात होणाऱ्या बदलामुळे शेतकरी आणि बागायतदार चिंतेत आहेत.

पावसाची शक्यता

२० एप्रिल ते २६ एप्रिल विदर्भ, मराठवडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा स्कायमेटनं वर्तवला आहे. तर काही भागांमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. दुसरीकडे मुंबईसह अनेक शहरांमध्ये त्याच वेळी तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अकोला, जळगाव जिह्यात ४०हून अधिक तापमान जाण्याची शक्यता आहे.


तापमानात होणार वाढ

नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर इथं पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे इथंही पावसाचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. या आठवड्याभरात संध्याकळच्या सुमारास राज्यातील वातावरण कोरडं राहिल. आसपासच्या राज्यात आर्द्रता कायम राहील आणि महाराष्ट्रातील बर्‍याच ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर दुसकीकडे तापमानात कमालीची वाढ होण्याची शक्यताही वर्तवली आहे.


शेतकरी चिंतेत

बदलत्या वातावरणामुळे आंबा, काजूसह इतर फळबागायतदारांचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. कापलेली पिकं नीट ठेवण्याचं आवाहन स्काटमेटकडून करण्यात आलं आहे. अन्यथा पावसामुळे नुकसान होऊ शकतं, असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा