मुंबई - वृक्षतोड रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अनेक उपाययोजना राबवल्या जातात. पण सरकारकडून राजरोसपणे विकासाच्या नावावर झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. 2010 ते 2016 या सहा वर्षांच्या काळात पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे 25,018 झाडांच्या कत्तलसाठीचे प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती माहिती अधिकाराखाली उघड झालीय. या वाढत्या वृक्षतोडीमुळे फेब्रुवारी महिन्यातच मुंबईकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. ही आकडेवारी आणि पर्यावरण अभ्यासकांचं म्हणणं ऐकलं तर विकास नक्की कुणाचा आणि कशाच्या मोबदल्यात होतोय असाच प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडलाय.