Advertisement

२५ सप्टेंबरपासून मान्सून मुंबईतून 'माघारी'

मुंबई आणि आसपासच्या परिसरात २५ सप्टेंबरपासून मान्सून माघारी परतण्यास सुरूवात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागा (आयएमडी)ने केला आहे.

२५ सप्टेंबरपासून मान्सून मुंबईतून 'माघारी'
SHARES

सध्या मुंबईत हलक्या पावसाच्या सरी बरसत असल्या तरी २५ सप्टेंबरपासून हळुहळू मुंबई परिसरात मान्सून पुन्हा 'माघारी' परतण्यास सुरूवात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागा (आयएमडी) ने वर्तवला आहे.


हलका पाऊस पडणार

२० आणि २२ सप्टेंबर दरम्यान पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांत पाऊस पडल्यानंतर मान्सून माघारी परतू लागेल, तर २५ सप्टेंबरपासून मुंबई आणि आसपासच्या भागातून मान्सून परतीच्या मार्गाला लागेल. परंतु 'माघारी' परतण्यापूर्वी मुंबईतसहित महाराष्ट्राच्या काही भागांत हलका पाऊस होईल, मात्र जोरदार पावसाची शक्यता फारच कमी असल्याचा 'आयएमडी' चा अंदाज आहे.


पुरेसा जलसाठा

पावसाची धार कमी झाल्याने मुंबईत आॅगस्ट महिन्यामध्ये केवळ सरासरीच्या तुलनेत केवळ ४८ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. सुदैवाने मान्सूनच्या सुरूवातीलाच चांगला पाऊस पडल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुरेसा जलसाठा
जमा झाला आहे.



हेही वाचा-

मुंबईकरांचं पाण्याचं टेंशन खल्लास



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा