मुंबईत सोमवारी रात्री वीजांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने मुंबईकर खूश झाले आहेत. परंतु हा मान्सूनपूर्व पाऊस नसल्याचा खुलासा हवामान खात्याने केला. चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत पाऊस पडल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. त्यातच ‘वायू’ चक्रीवादळ बुधवारी जोर पकडण्याची शक्यता असल्याने पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस लांबू शकतो, असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.
त्यातच अरबी समुद्रात तयार झालेलं 'वायू' चक्रीवादळ जोर पकडण्याची शक्यता असल्याने पश्चिम किनारपट्टीवरील पावसाचे आगमन काही दिवसांनी लांबणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या दरम्यान समुद्र खवळणार असल्याने माच्छिमारांनी ११ आणि १२ जून रोजी समुद्रात जाऊ नये असं आवाहनही हवामान विभागाने केलं आहे. बुधवारी अरबी समुद्रात सुमारे ताशी १२०-१३५ किमीच्या वेगाने, तर महाराष्ट्राजवळील समुद्रात ताशी ७० किमी वेगाने वारे वाहतील, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
हेही वाचा-
पावसाळ्यात झाडाखाली उभं राहू नका; पालिकेचा मुंबईकरांना सावधानतेचा इशारा
अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता, मासेमारांना सतर्कतेचा इशारा