Advertisement

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत सागर देशमुखची एण्ट्री

छोट्या पडद्याच्या इतिहासात प्रथमच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित असलेली मालिका प्रेक्षकांसमोर इतिहासाची पानं उलगडत आहे. आता या मालिकेत मोठ्या बाबासाहेबांची म्हणजेच अभिनेता सागर देशमुखची एंट्री होणार आहे.

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत सागर देशमुखची एण्ट्री
SHARES

छोट्या पडद्याच्या इतिहासात प्रथमच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित असलेली मालिका प्रेक्षकांसमोर इतिहासाची पानं उलगडत आहे. आता या मालिकेत मोठ्या बाबासाहेबांची म्हणजेच अभिनेता सागर देशमुखची एंट्री होणार आहे.


महामानवाची गौरवगाथा 

स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेतून महामानवाची गौरवगाथा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे. बाबासाहेबांच्या बालपणीची भूमिका साकारली बालकलाकार अमृत गायकवाडनं, त्यानंतर बाबासाहेबांच्या बालरुपात श्रीहरी अभ्यंकरनं प्रेक्षकांची मनं जिंकली. संकेत कोर्लेकरने साकारलेल्या तरुणपणीच्या बाबासाहेबांच्या भूमिकेवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. लवकरच अभिनेता सागर देशमुख बाबासाहेबांच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. 


द्विधा मनस्थितीत

मोठ्या पडद्यावर पु. ल. देशपांडे साकारलेल्या सागरच्या एण्ट्रीनं मालिकेतही नवा अध्याय सुरू होणार आहे. पुढील शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाडांकडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांच्या अटीनुसार बाबासाहेबांना बडोद्याला नोकरीनिमित्तानं जावं लागणार आहे. मात्र नोकरी करण्यास बाबासाहेबांच्या वडिलांचा नकार आहे. त्यामुळं सजायीराजेंना दिलेला शब्द पाळावा की, वडिलांचं मन राखावं अश्या द्विधा मनस्थितीत अडकलेले बाबासाहेब बडोद्याला जायचं ठरवतात. 


रामजी बाबा दुखावतात

बाबासाहेबांच्या या निर्णयामुळं रामजी बाबा दुखावतात. जातियतेचा विखारी अनुभव बडोद्यामध्येही येईल याची बाबासाहेबांना पुर्वसूचना देतात. मात्र बाबासाहेब सयाजीराजेंना दिलेला शब्द पाळण्यासाठी बडोद्याला रवाना होतात. बाबासाहेबांच्या अनुपस्थितीत रमाई संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेते. वचनपूर्तीसाठी कुटुंबाची होणारी ताटातूट बाबासाहेबांना अस्वस्थ करते. बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा अत्यंत भावनिक प्रसंग मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

https://www.facebook.com/StarPravahOfficial/videos/499061990905952/


नवं आव्हान 

या नव्या अध्यायाविषयी सागर म्हणाला की, महामानवाची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. ही व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. जबाबदारीचं ओझं असलं तरी ही हवीहवीशी वाटणारी जबाबदारी आहे. मनात सकारात्मक धाकधूक आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा काळ मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडणार आहे. प्रेक्षक मालिकेवर भरभरुन प्रेम करतच आहेत हा जिव्हाळा असाच कायम रहावा हीच अपेक्षा.




हेही वाचा -

कोण असेल फिनालेमध्ये पोहोचणारा पहिला सदस्य ? 

‘सेक्रेड गेम्स’ वादात, शीख धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी अनुराग कश्यपविरोधात तक्रार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा