दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) निदर्शने जाहीर केल्यानंतर, मंगळवारी 21 जुलै मुंबईत (mumbai) सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आझाद मैदान (Azad maidan protest), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (brihanmumbai municipal corporation) मुख्यालय यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस (mumbai police) तैनात करण्यात आले होते.
सोमवारी 20 जुलै नवी दिल्लीत CJP च्या 'चलो संसद' मोर्चादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर प्रशासन सतर्क झाले होते.
यामुळे शहरात विविध मोक्याच्या ठिकाणी बॅरिकेड्स, दंगल नियंत्रण वाहने आणि सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याचे दिसून आले.
दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ शहरात झालेल्या निदर्शनांच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी आठ गुन्हे (FIR) दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही कडक सुरक्षा व्यवस्था दिसून आली. या प्रकरणी 900 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात 600 हून अधिक आंदोलकांवर कारवाई करण्यात आली.
तसेच, कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने आयोजित केल्याप्रकरणी माहिम, दादर, शीव, वरळी, काळाचौकी, भोईवाडा आणि वडाळा टीटी पोलीस ठाण्यांमध्येही अतिरिक्त गुन्हे दाखल करण्यात आले.
सोमवारी दादरमधील चैत्यभूमीजवळ झालेल्या निदर्शनादरम्यान शांततापूर्ण आंदोलकांना ताब्यात घेतल्याचा आरोप CJP ने मुंबई पोलिसांवर केला.
हे आंदोलन दिल्लीतील जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे पक्षाने पुकारलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आले होते.
तसेच तिथे समर्थक NEET परीक्षेतील कथित अनियमिततेमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
दिल्लीतील सोमवारी झालेल्या 'चलो संसद' मोर्चादरम्यान जखमी झालेल्या समर्थकांची CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांनी माफी मागितली.
आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या संरक्षणासाठी आपण आणखी काही करू शकलो असतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्याचा प्रयत्न करतानाच सरकारने आंदोलकांवर बळाचा वापर केला, असा आरोपही दिपके यांनी केला.
'नीट' (NEET) परीक्षेतील कथित वादामुळे प्रधान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पक्षाकडून केली जात आहे.
मुंबईतील आंदोलनाने शनिवार-रविवारी जोर धरला; दादरमधील शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि राजकीय कार्यकर्ते जमा झाले.
यामध्ये 'स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया' (SFI), 'ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन' (AISF) आणि अनेक युवा संघटनांच्या सदस्यांचा समावेश होता.
आंदोलकांनी हातात फलक घेऊन आणि घोषणा देत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली तसेच केंद्र सरकारवर टीका केली.
जमाव वाढू नये म्हणून पोलिसांनी प्रयत्न केले आणि अनेक आंदोलकांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेतले. या आंदोलनाला राजकीय नेत्यांचाही पाठिंबा मिळाला.
19 जुलै रोजी रविवारी शिवाजी पार्कबाहेर झालेल्या एका सभेत, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांशी एकता दर्शवली आणि केंद्राविरुद्ध देशव्यापी आंदोलन उभारण्याचे आवाहन केले.
ठाण्यातही अशीच आंदोलने झाली; तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), शिवसेना (UBT), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसोबतच, आंदोलकांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली आणि शांततापूर्ण निदर्शने दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
विद्यार्थी संघटनांनी केंद्राच्या कृतीला विरोध दर्शवणारे पथनाट्य सादर केले आणि राजधानीत सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केला.
हेही वाचा
