Advertisement

कोरोनाचा हाहाकार ! राज्यात कोरोनाचे 1230 नवे रुग्ण, दिवसभरात 36 जणांचा बळी


कोरोनाचा हाहाकार ! राज्यात कोरोनाचे 1230 नवे रुग्ण, दिवसभरात 36 जणांचा बळी
SHARES

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, महाराष्ट्रात शनिवावारी  कोरोना रुग्णांनी 20 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यात मंगळवारी दिवसभरात 1230 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात 36 जणांचा बळी गेला आहे. तर 587 जणांना मंगळवारी घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोनाने बाधित 23 हजार 401 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.  रविवार आणि सोमवार या दोन दिवसात तब्बल  89जणांचा मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये आता भितीचे वातावरण आहे.

राज्यभरात कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. मंगळवारी दिवसभरात कोरोनाच्या  2 लाख  18 हजार 1 नमुन्यांपैकी   लाख 93  हजार 457 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर  23 हजार  401 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख  48 हजार 301  लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 15 हजार 192 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोना या महामारीने मृत्य पावलेल्यांची संख्या 868 आता  इतकी झाली आहे.

 मंगळवारी मृत पावलेल्या 36 नागरिकांमध्ये मुंबईतील 20, सोलापूर 5, पुणे 3, ठाणे 1 अमरावती,औरंगाबाद, रत्नागिरी, वर्धा आणि नांदेड परिसरात प्रत्येक 1 मृतांची संख्या आहे. मंगळवारी झालेल्या 36  मृत्यूमध्ये पुरूष 23 आणि 13 महिलांचा समावेश आहे. 60 वर्षे किंवा त्यावरील 17 रुग्ण आहेत तर 16 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षाच्या खालील आहेत. या 36 मृतांपैकी 27 जणांमध्ये (75 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कोरोना रुग्णांची विश्लेक्षणांनुसार माहिती

कोरोना बाधित रुग्णांमधील 59 टक्के म्हणजेच 5228 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे विरहित आहेत. 

39 टक्के म्हणजेच 3209 रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्येम लक्षणे आढळून आली आहेत.

फक्त 5 टक्के रुग्ण गंभीर स्वरुपाचे असून त्यातील 236 म्हणजेच 3 टक्के नागरिकांना आँक्सीजनची आवश्यकता, तर 92 रुग्ण म्हणजेच 1 टक्का रुग्ण व्हँन्टीलेटरवर आहेत. 

 इतर 96 रुग्ण इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा