Advertisement

कोरोनाचा कहर! राज्यात कोरोनाने गाठला २५ हजारांचा टप्पा, दिवसभरात २३४५ नव्या रुग्णांची नोंद

आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरोनाचा कहर!  राज्यात कोरोनाने गाठला २५ हजारांचा टप्पा, दिवसभरात २३४५ नव्या रुग्णांची नोंद
SHARES

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेॆदिवस वाढतच असून राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ पोहचली आहे. गुरूवारी २३४५ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १४०८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

राज्यात कोरोनाची लक्षण आढळलेल्या ३ लाख १९ हजार ७१० नमुन्यांपैकी २ लाख ७८ हजार ६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ४१ हजार ६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ३७ हजार ३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात गुरवारी दिवसभरात ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १४५४ झाली आहे. गुरूवारी झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद  शहरात ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी- चिंचवड -१ तर सोलापूरात १  मृत्यू झाले आहेत. 

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३६  पुरुष तर २८ महिला आहेत. आज झालेल्या ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१  रुग्ण आहेत तर २९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये ( ५९ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे. 

*राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील:(कंसात मृत्यूंची आकडेवारी)*

मुंबई महानगरपालिका: २५,५०० (८८२)

ठाणे: ३३८ (४) 

ठाणे मनपा: २०४८ (३३)

नवी मुंबई मनपा: १६६८ (३३)

कल्याण डोंबिवली मनपा: ६४१ (६)

उल्हासनगर मनपा: १३१ (२)

भिवंडी निजामपूर मनपा: ८० (३)

मीरा भाईंदर मनपा: ३६२ (४)

पालघर:१०२  (३)

वसई विरार मनपा: ४२५ (११)

रायगड: २८५ (५)

पनवेल मनपा: २७१ (११)

*ठाणे मंडळ एकूण: ३१,८५१ (९९६)*

नाशिक: ११३

नाशिक मनपा: ८४ (२)

मालेगाव मनपा: ७१० (४३)

अहमदनगर: ४७ (५)

अहमदनगर मनपा: १९

धुळे: १५ (३)

धुळे मनपा: ८० (६)

जळगाव: २५२ (२९)

जळगाव मनपा: ७९ (४)

नंदूरबार: २६ (२)

*नाशिक मंडळ एकूण: १४२५ (९४)*

पुणे: २५५ (५)

पुणे मनपा: ४२०७ (२२२)

पिंपरी चिंचवड मनपा: २०३ (७)

सोलापूर: १० (१)

सोलापूर मनपा:५१२ (२७)

सातारा: १८४ (२)

*पुणे मंडळ एकूण: ५३७१ (२६४)*

कोल्हापूर:१४१  (१)

कोल्हापूर मनपा: २० 

सांगली: ५४

सांगली मिरज कुपवाड मनपा: ९ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी:  १२३ (३)

*कोल्हापूर मंडळ एकूण: ३५७ (५)*

औरंगाबाद:२०

औरंगाबाद मनपा: ११०६ (३९)

जालना: ४३

हिंगोली: ११०

परभणी: १५ (१)

परभणी मनपा: ३

*औरंगाबाद मंडळ एकूण: १२९७ (४०)*

लातूर: ५१ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: १९

बीड: १३

नांदेड: ११

नांदेड मनपा: ८१ (४)

*लातूर मंडळ एकूण: १७८ (६)*

अकोला: २९ (२)

अकोला मनपा: ३१५ (१५)

अमरावती: ९ (२)

अमरावती मनपा:  १३१ (१२)

यवतमाळ: १११

बुलढाणा:३८ (३)

वाशिम: ८

*अकोला मंडळ एकूण:६४१ (३४)*

नागपूर: ३

नागपूर मनपा: ४३४ (६)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ९

गोंदिया: ३

चंद्रपूर:  ८

चंद्रपूर मनपा: ७

गडचिरोली: ७

*नागपूर मंडळ एकूण:  ४७४ (७)*

इतर राज्ये: ४८ (११)

*एकूण:  ४१ हजार ६४२  (१४५४)*


*(टीप-आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २४२ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो)*

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १५ हजार ८९४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६४.८९  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा