Advertisement

राज्यात ९० लाखांहून अधिक जणांनी चुकवला दुसरा डोस

कोरोनाचे नवे म्युटेशन ओमायक्रॉनमुळं जगात दहशत निर्माण झाली आहे. अशातच कोरोना प्रतिबंधत लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारत आहे.

राज्यात ९० लाखांहून अधिक जणांनी चुकवला दुसरा डोस
SHARES

कोरोनाचे नवे म्युटेशन ओमायक्रॉनमुळं जगात दहशत निर्माण झाली आहे. अशातच कोरोना प्रतिबंधत लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारत आहे. मात्र अनेकांनी या लसीचा दुसरा डोस चुकवल्याची माहिती मिळते. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या लाभार्थ्यांचं प्रमाण ४१ टक्के आहे. तर पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रमाण ८० टक्के आहे. 

राज्यात अजूनही ९० लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतलेला नसल्याचं आरोग्य विभागाच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. राज्यात दैनंदिन लसीकरणाचे प्रमाण कमालीचं घटलं आहे. सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण ७ लाख ६० हजार ९५५, ऑक्टोबर महिन्यात ५ लाख २५ हजार १२१ वर तर नोव्हेंबर महिन्यात ४ लाख ६३ हजार ३८९ वर आलं आहे.

राज्यात लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि लसीचा डोस चुकलेल्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सुमारे ७० हजार आशा सेविका कार्यरत आहेत. लसीच्या पहिल्या डोसमुळं नक्कीच संरक्षण मिळतं. मात्र, दुसरा डोस घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यामुळं आजार गंभीर स्थितीला जात नाही. शिवाय, रुग्णालयात दाखल होण्याची शक्यताही अत्यल्प असते.

राज्यातील लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. दिवाळीनंतर लसीकरणाकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानेही काही लाभार्थी दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचं दिसतंय. मात्र, ही धोक्याची घंटा ठरू शकते. सध्या म्युटेशनमुळं नव्यानं धडकलेल्या ओमायक्रॉनचा धोका असताना लसीकरण हाच प्रभावी मार्ग आहे.

पालघर, नंदुरबार, गडचिरोली आणि अमरावती या आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची संख्या कमी आहे. राज्यातील ३६ पैकी २२ जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. अकोला, नंदुरबार, बीड आणि अमरावतीत पहिल्या डोससह केवळ ५५ टक्के पात्र लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. काही समुदायांमध्ये लसीबाबत संकोच आहे. यासाठी पुढाकार घेत कार्यक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनांना देण्यात आले आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा