Advertisement

चिंताजनक! राज्यात कोरोना बळींमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वात जास्त


चिंताजनक! राज्यात कोरोना बळींमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वात जास्त
SHARES
राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 60 वर्षांवरील 20 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर 30 ते 50 वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची सर्वाधिक लागण झाल्याचेही आढळून आले आहे.
राज्यात आतापर्यंत 748 जणांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे.

 यात 31 ते 40 वयोगटातील 128 जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर 41 ते 50 वयोगटातील 133 जणांना कोरोनाची लागण झाली असून या वयोगटातील 5 जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. 51 ते 60 वयोगटातील 88 जण कोरोनाबाधित असून 5 जण दगावले आहेत. तसेच 61 ते 70 वयोगटातील 73 जणांना कोरोनाची लागण झाली असून या वयोगटातील सर्वाधिक म्हणजे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 71 ते 80 वयोगटातील 73 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 4 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर 81 ते 90 या वयोगटातील 9 लोक बाधित झाले असून दोन जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. प्रयोगशाळेत आजपयर्ंत पाठविण्यात आलेल्या 16008 नमुन्यांपैकी 14837 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 748 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 56 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 46,586 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 3122 जण संस्थात्मक क्वॉरंटाइन मध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता. त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 7 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे.  तर त्यांच्या  निकटसहवासितांपैकी 5 जण पिंपरी चिंचवड येथे कोरोना बाधित आढळले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात यासाठी 519 टीम काम करत आहेत
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा