गडचिंचले गावातील २३ आरोपींना वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे. यापैकी ११ आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आणखी ६ आरोपींचे स्वॅब तपासणीसाठी देण्यात आले आहेत. त्याचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही. एका आरोपीचा कोरोना चाचणी अहवाल २ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. आणखी ११ आरोपांना करोनाची लागण झाल्याने वाडा शहरात सगळेच हादरले आहेत.
काय आहे प्रकरण?
पालघरमधील गडचिंचले गावात २ साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. १७ एप्रिल रोजी दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं. हे प्रकरण चिघळल्यावर आरोपी जंगलात लपून बसले हाेते. पोलिसांनी जंगलात जाऊन 110 आरोपींना अटक केली होती. यामध्ये ९ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.
हेही वाचा -
मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता
कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा