Advertisement

राज्यातील 'या' ५ जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी

राज्यात उपचाराधीन रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळच आहे.

राज्यातील 'या' ५ जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी
SHARES

राज्यात उपचाराधीन रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळच आहे. सार्वजनिक आरोग्यविभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर या ५ जिल्ह्यांमधील एकत्रित उपचाराधीन रुग्णसंख्या पाहिली असता, त्यात १० टक्क्यांनी घट दिसून येते. मात्र, नागपूर आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते.

नागपूरमध्ये ही वाढ २०२.६२ टक्के, तर पुण्यात ११०.६८ टक्के असल्याचे दिसून येते. अतिदक्षता विभागामध्ये असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये किंचित घट झाल्याचे दिसून येते. दुसऱ्या लाटेच्या वेळी ही रुग्णसंख्या मोठी होती. ९ जानेवारीला गंभीर रुग्ण २.९७ टक्के होते. त्यापैकी ०.८८ टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले होते.

१२ जानेवारीला हे प्रमाण २.३४ टक्के इतके होते त्यापैकी ०.८४ टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले होते. १६ जानेवारी रोजी ०.८६ तर १८ जानेवारी रोजी ०.९१ टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागाची गरज लागल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते.

राज्यातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचा दर हा २३.४८ टक्के असला तरीही रायगड, नाशिक, पुणे, अकोला, नांदेड, वर्धा, ठाणे नागपूर, सांगली आणि सिंधुदुर्ग येथे साप्ताहिक पॉझिटिव्हिटिचा दर हा त्यापेक्षा अधिक असल्याचा दिसतो.नाशिक, पुणे, रायगड, अकोला येथे हा दर ३० ते ३८ टक्के असून ठाणे, नागपूर, नांदेड येथे तो २५ टक्क्यांपेक्षा अधिक नोंदवण्यात आला आहे.

मुंबईमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा हा दर कमी आहे. कोल्हापूर, सोलापूर सातारा, लातूर, नंदुरबार, धुळे, चंद्रपूर येथे हा दर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असून, तो १८ ते २३ टक्क्यांच्या मध्ये असल्याचे दिसून येते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा