४ डिसेंबरपासून महाराष्ट्रात सापडलेल्या कोविड-१९ ओमिक्रॉनच्या 80 टक्के रुग्णांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, आतापर्यंत ओमिक्रॉनमुळे देशात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
परिस्थिती पाहता, राज्य सरकार आणि पालिकेनं लोकांना खबरदारी घेण्यास सांगितलं आहे आणि यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे.
१९ डिसेंबरपर्यंत, राज्यात आढळून आलेल्या ५४ ओमिक्रॉन प्रकरणांपैकी, ४४ लोकांना संपूर्ण लसीकरण करण्यात आले. उर्वरित १० प्रकरणांमध्ये, दोघांना लसीकरण करण्यात आले नव्हते. परंतु एकाची चाचणी यापूर्वी सकारात्मक आली होती. दुसरीकडे ८ जण अल्पवयीन असल्यानं त्यांना लसीकरण करण्यात आलं नाही.
राज्यात ६.६ दशलक्षाहून अधिक कोविड-१९ प्रकरणं नोंदवली गेली आहेत. राज्याचे संपूर्ण लसीकरण ५४ टक्क्यांवर पोहोचले असून ८६ टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
ओमिक्रॉनमुळे फक्त सौम्य संसर्ग होतो. डॉक्टर होम आयसोलेशनसाठी कॉल करतात. याशिवाय, रुग्णांनी विनाकारण हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये यासाठी महाराष्ट्रात संस्थात्मक विलगीकरण प्रोटोकॉलही मागितल्याचा त्यांचा दावा आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात ऑमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण २३ रुग्ण हे ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत.
यात १३ जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आहे. तर १० रुग्ण या परिसरातील आहेत. आतापर्यंत १३ रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशभरातील ऑमिक्रॉन रुग्णांची आकडेवारी
हेही वाचा