Advertisement

राज्यात मोठ्या प्रमाणत नागरिकांनी केली कोरोनावर मात, मृत्यूच्या संख्येतही घट


राज्यात मोठ्या प्रमाणत नागरिकांनी केली कोरोनावर मात, मृत्यूच्या संख्येतही घट
SHARES

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. सोमवारी राज्यात तब्बल ६ हजार ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली (patients discharged today). गेल्या काही दिवसांमधली ही सर्वात जास्त संख्या आहे. आत्तापर्यंत राज्यात १७,८९,९५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा Recovery rate हा ९४.२४वर गेला आहे. तर दिवसभरात २८३४ नवे रुग्ण आढळून आलेत. गेल्या २४ तासांमध्ये ५५ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा ३.५७ झाला आहे. तर कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही १८,९९,५२ एवढी झाली आहे.ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचं बदललेलं रुप आढळल्याने राज्यात खबरदारी घेण्यात येत असून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत.

राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६  पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा