Advertisement

वरळी किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी दीड कोटींचा निधी

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईच्या वैभवात भर घालू शकणाऱ्या वरळी किल्ल्याचं जतन आणि संवर्धन होणं गरजेचं आहे.

वरळी किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी दीड कोटींचा निधी
SHARES

मुंबईचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या वरळी किल्ल्याचं जतन करणं गरजेचं आहे, असं सांगत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी वरळी किल्ला सुशोभीकरण व संवर्धनासाठी मुंबई महापालिका, राज्य पुरातत्व संचालनालय आणि पर्यटन विभाग यांच्यामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना केली.

वरळी किल्ला सुशोभीकरण व संवर्धनाबाबत पआदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला माजी राज्यमंत्री सचिन अहीर, माजी आमदार सुनिल शिंदे, नगरसेविका हेमांगी वरळीकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर – सिंह, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक डॉ.धनंजय सावळकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा- आरेतील ८०० एकर जागेत होणार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार

वरळी किल्ल्याचं जतन, संवर्धन करणे तसंच किल्ल्याचं सौंदर्यीकरण करण्याच्या अनुषंगाने त्यावर प्रकाशझोत टाकणे (illumination) आदी कामांसाठी दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महापालिका आणि राज्य पुरातत्व संचालनालयामार्फत ही कामे करण्यात येतील. यासंदर्भात पाठपुरावा करुन हा प्रस्ताव मान्य करणे तसंच त्याप्रमाणे किल्ला जतन, संवर्धन आणि सुशोभिकरणाची कामे करण्यात यावीत, अशा सूचना मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईच्या वैभवात भर घालू शकणाऱ्या वरळी किल्ल्याचं जतन आणि संवर्धन होणं गरजेचं आहे. याअनुषंगाने जेट्टी तयार करुन वांद्रे ते वरळी किल्ला बोटसफरही सुरु करता येईल. यातून स्थानिकांना, मच्छिमारांना रोजगार देता येऊ शकेल. 

हेही वाचा- माहुलमधील प्रदूषण नियंत्रीत करा, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे निर्देश

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा