Advertisement

'रे राया...'च्या गीतांना जावेद, कैलाश, वैशालीसह मंगेशचा सूर!


'रे राया...'च्या गीतांना जावेद, कैलाश, वैशालीसह मंगेशचा सूर!
SHARES

अभिनेता मिलिंद शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'रे राया... कर धावा' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमातील गीतांना भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीच्या गायकांचा सूर लाभला आहे.

'रे राया...' या चित्रपटात एकूण तीन गाणी असून, तीनही गाणी मिलिंद शिंदे यांनी लिहिली आहेत. 'जाऊ कुणीकडे...', 'दगड ओठ...' या दोन गाण्यांसह 'रे राया...' हे टायटल साँग आहे. संगीतकार मंगेश धाकडे यांनी जावेद अली, कैलाश खेर यांच्यासह वैशाली भैसने माडे आणि स्वत:च्या आवाजात ही गाणी संगीतबद्ध केली आहेत.


कैलाशच्या भावना...

'मी गायलेल्या गाण्याचे शब्दच इतके दमदार आहेत, की गाणं ऐकल्यावर गाण्याचा मोह आवरता आला नाही. अस्सल मराठी मातीतलं हे गाणं रसिकांच्या मनाचा ठाव घेईल. महाराष्ट्राला मोठी सांगीतिक परंपरा आहे. आताच्या काळातील संगीतही तीच परंपरा पुढे नेणारं आहे. अर्थपूर्ण, ह्रदयाला भिडणारे शब्द आणि संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या संगीतानं मराठी संगीत अधिक लोकप्रिय होत आहे, ही नक्कीच आनंदाची गोष्ट' असल्याचं कैलाश खेर म्हणाले.


तरुण धावपटूंचा प्रवास...

ग्रामीण भागातील मुलांचा धावपटू होण्याचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. भूषण प्रधान अॅथलेटिक्स प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


आघाडीच्या कलाकारांचा समावेश...

भूषणसह संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, प्रकाश धोत्रे, नयन जाधव, सुदर्शन पाटील यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कार विजेता विवेक चाबुकस्वार, हंसराज जगताप यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा