Advertisement

संजूच्या मराठी 'बाबा'चा पहिला टीझर प्रदर्शित

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांच्या पावलावर पाऊल ठेवत संजय दत्तही मराठी चित्रपट निर्माता बनल्याचं आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे. संजूची निर्मिती असलेल्या 'बाबा' या पहिल्या मराठी चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

संजूच्या मराठी 'बाबा'चा पहिला टीझर प्रदर्शित
SHARES

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांच्या पावलावर पाऊल ठेवत संजय दत्तही मराठी चित्रपट निर्माता बनल्याचं आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे. संजूची निर्मिती असलेल्या 'बाबा' या पहिल्या मराठी चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.


पोस्टर प्रदर्शित 

मराठी चित्रपटक्षेत्रामध्ये सध्या 'बाबा' या संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाची सहनिर्मिती संजय एस दत्त प्रॉडक्शन्स यांच्याबरोबर ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्सच्या अशोक आणि आरती सुभेदार यांच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. या मराठी चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. याहीपेक्षा या चित्रपटाच्या निमित्तानं बॅालिवुडमधील आणखी एक स्टार मराठी चित्रपट निर्मितीकडं वळल्याचा मराठी रसिकांना आनंद आहे.


२ ऑगस्टला प्रदर्शित 

चित्रपटाच्या टीझरवरून या चित्रपटाच्या कथेची कल्पना येते. ही कथा एका वडील व मुलाच्या सुंदर नात्याभोवती फिरते. हा चित्रपट २ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. 'बाबा'मध्ये 'तनु वेडस मनू' आणि 'हिंदी मिडीयम' फेम दीपक दोब्रीयाल याची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दीपक मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. दीपकसोबत नंदिता पाटकर चित्रपटात दिसणार आहे. त्यांना स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि प्रमुख भूमिकेतील बालकलाकार आर्यन मेंघजी यांची साथ आहे. 


निरागसतेची कथा

राज आर. गुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. संजय दत्त यांनी त्यांच्या ट्वीटरच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधत 'बाबा'चा पहिला टीझर प्रदार्शित केला आहे. संजयनं ट्वीट केलं आहे की, आमची पहिली मराठी चित्रपट निर्मिती 'बाबा'चा टीझर प्रदर्शित करत आहोत. मान्यता दत्त यांनीही 'बाबा'चा टीझर प्रकाशित करताना, निरागसतेची अत्यंत सुंदररीत्या विणलेली कथा असं ट्वीट केलं आहे. दिग्दर्शक गुप्ता यांच्या म्हणाले की, भावनांना भाषा नसते असं माझं ठाम मत आहे. हा संदेश या चित्रपटातील कलाकारांनी अगदी सुंदररित्या अधोरेखित केला आहे. एक कुटुंब सर्व आव्हानांवर मात करत एकत्र राहण्यासाठी कशी धडपड करत असते, याची ही एक कथा आहे.

लिंक - https://www.youtube.com/watch?v=Nnub-suL6oQ



हेही वाचा -

तीन भागांमध्ये बनणार 'रामायण'

सलमानचा 'भारत' पहिल्या सहामाहीतला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा