कोरोना योद्ध्यांना तिसरा डोस देण्याचा विचार करावा. तसंच, लसीकरणात किमान वय हे १५ वर्ष करावे, असे पत्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना लिहले आहे.
आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलेला पत्रात तीन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी दुपारपर्यंत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १० झाली आहे. तर ११ संशयित रुग्णांचे सॅम्पल जिनोम सीक्वेन्सिंगला पाठवण्यात आले आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून ठाणे जिल्ह्यात २९५ प्रवासी आले होते. त्यातील १०९ जणांचा काहीच पत्ता लागत नाही. परदेशातून आल्यानंतर त्यांनी आपले मोबाईल क्रमांक आणि पत्ता नमूद केला होता.
परंतु, या सर्वांचे मोबाईल फोन बंद आहेत. त्यांनी दिलेला पत्ता तपासून पाहिला असता तो देखील खोटा निघाला आहे. आता हे लोक जोपर्यंत ट्रेस होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात संक्रमण फैलावण्याची भीती आहे.
हेही वाचा